“रावणालाही लाज वाटेल असे मंत्री ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळात बसले आहेत”

 

मुंबई |  काही दिवसांपूर्वी साकीनाका येथे घडलेल्या प्रकरणानंतर डोंबिवलीत एका अल्पवयीन मुलीवर ३० जनांनी अत्याचार केल्याची घटना समोर आली होती. या घटनेमुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापू लागले होते. तर दुसरीकडे राज्यपाल कोश्यारी यांनी पत्र लिहून दोन दिवसाचे अधिवेशन घेण्याचे मुख्यमंत्र्यांना सुचवले होते तर या पत्राला मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सडेतोड उत्तर दिले होते. याच मुद्द्यावरून सामनामधून विरोधकांवर टीका करणाऱ्या संजय राऊत यांना आमदार अतुल भातखळकर यांनी जोरदार टोला लगावला होता.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी रामायण आणि रावण यांच्या बाबत एक वक्तव्य केलं आहे. या वक्तव्यावरून राज्यातील भाजप नेत्यांनी संजय राऊत यांना चांगलेचं खडेबोल सुनावले आहेत. महाविकास आघाडी सरकार मधील मंत्र्यांना सुद्धा भाजपनं लक्ष केलं आहे. भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली.

भातखळकर यांनी ट्विट करत महाविकास आघाडी सरकारवर जहरी टीका केली आहे. रावणालाही लाज वाटेल असे मंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रीमंडळात आहेत. यांना रावणाबाबत ममत्व असणं स्वाभाविकचं नाही का?, असा प्रश्न भातखळकर यांनी उपस्थित केला आहे. आता या टीकेला महाविकास आघाडी सरकार काय प्रतिउत्तर देते हे पाहावे लागणार आहे.

Team Global News Marathi: