Saturday, February 4, 2023
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result

एकनाथ शिंदे रडीचा डाव खेळले, जयंत पाटील यांची टीका

by ग्लोबल न्युज नेटवर्क
June 29, 2022
in महाराष्ट्र
0
एकनाथ शिंदे रडीचा डाव खेळले, जयंत पाटील यांची टीका

एकनाथ शिंदे रडीचा डाव खेळले, जयंत पाटील यांची टीका

मुंबई : उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर राज्यातलं महाविकास आघाडी सरकार कोसळलं आहे. यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे.

गेल्या अडीच वर्षात 12 हजार कोटी हे नगरविकास खात्यात दिले गेले आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे गटाचा आरोप चुकीचा आहे. रडीचा डाव खेळायचा असेल तर कुणाला तरी दोष द्यायचा म्हणून राष्ट्रवादीला जाणीवपूर्वक दोष देण्याचं काम करण्यात आल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात महाविकास आघाडीचा एक अद्भूत प्रयोग आमचे नेते शरद पवार यांनी केला. महाराष्ट्राच्या विकासासाठी राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना हे तीनही पक्ष पवारांनी एकत्रित केले. गेली अडीच वर्ष महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यापासून अनेक चांगल्या योजना आणि लोकांची सेवा करण्याचा प्रयत्न या सरकारने केला असं जयंत पाटील यांनी सांगितलं.

राज्याच्या राजकारणात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी लोकांशी संवाद साधत पायउतार होण्याचा निर्णय घेतला. एक सरळ, चांगला आणि लोकांच्या सेवेसाठी कटिबद्ध असणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळाला होता. मुख्यमंत्री म्हणून शेवटचं भाषण करताना सर्वांचेच आभार मानले. भविष्यात पुन्हा एकत्रित येऊन काम करण्याची भूमिकाही त्यांनी स्पष्ट केली.

महाराष्ट्रात शाहु, फुले, आंबेडकरांच्या विचारांचं सरकार टिकलं पाहिजे हा प्रयत्न केला. राष्ट्रवादी आणि काँग्रेसची संख्या कमी होती, भाजपच्या विरोधात शिवसेनेनंही आमच्याबरोबर येण्याचा निर्णय घेतला आणि हे सरकार चांगलं चाललं.

दुर्देवाने शिवसेनेतील काही आमदार त्यांच्यापासून दुरावले, महाराष्ट्राच्या बाहेर गेले. त्यांचं पाठबळ नाही हे पाहता उद्धव ठाकरे यांनी स्वत: पायउतार होण्याचा निर्णय घेतला.

कोरोनासारखं संकट आलं असताना मुख्यमंत्री आणि प्रशासन किती उत्तम काम करु शकतात याचं उदाहरण देशासमोर ठेवलं.
आज मुख्यमंत्री पायउतार झाले असले तरी महाराष्ट्राला मुख्यमंत्री म्हणून ते दिर्घकाळ लक्षात राहितील असं जंयत पाटील यांनी म्हटलंय.

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
Tags: एकनाथ शिंदेजयंत पाटीलमहाविकास आघाडी सरकार
ADVERTISEMENT
Next Post
उद्या होणार फडणवीस -शिंदे यांचा शपथविधी ; ही आहे संभाव्य मंत्रिमंडळाची यादी

उद्या होणार फडणवीस -शिंदे यांचा शपथविधी ; ही आहे संभाव्य मंत्रिमंडळाची यादी

Recent Posts

  • मालवणात बॅनर लावण्यावरून भाजप-ठाकरे शिवसेनेत वाद, नेमकं काय आहे प्रकरण
  • ईडी कारवाईनंतर केडीसी जिल्हा बँकेतील कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन
  • शुभांगी पाटील लवकरच उद्धव ठाकरे यांची घेणार भेट
  • व्हॉट्सअॅप स्टोरेज फुल झालं ? एका मिनिटात स्पेस कशी रिकामी करायचा
  • कसबा पोटनिवडणुकीतून टिळक कुटुंबियांना डावलून या नावाची जोरदार चर्चा

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group