एक दिवस मराठी माणूस नक्कीच दिल्लीच्या तख्तावर बसेल, काय म्हणाले देवेंद्र फडणवीस

 

मुंबई | दिल्लीच्या पदावर कधी ना कधी मराठी माणूस बसेलच, मराठी माणसाला कोण थांबवू शकते. एक दिवस नक्कीच मराठी माणूस दिल्लीच्या तख्तावर बसेल. कारण दिल्लीच्या तख्ताला सगळ्यात पहिले आव्हान मराठी माणसानेच दिले होते आणि दिल्लीचा तख्तही मराठी माणसानेच काबीज केला होता, असे वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले.

मात्र, आता ती वेळ नाही. कारण आता आपल्या देशाला इतके चांगले पंतप्रधान मिळाले आहे की, ते देश बदलवत आहेत. आपल्या देशाला जगात गौरव मिळत आहे. अशा स्थितीत महाराष्ट्र देखील त्यांच्या पाठीशी उभा आहे. आपण 2014 आणि 2019 ला देखील बघितले असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

एक दिवस मराठी माणूस दिल्लीच्या तख्तावर नक्की बसेल, पण तो कोण असेल ही त्यावेळची परिस्थिती ठरवेल असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. जे दिल्लीच्या तख्ताचे स्वप्न बघत होते, अशा मराठी माणसाच्या पाठिशा महाराष्ट्र उभा राहिला नाही तो मोदींच्याच पाठिशीच उभा राहिला असल्याचे फडणवीस म्हणाले.

जोपर्यंत मोदी आहेत, तोपर्यंत मला वाटत नाही की दुसऱ्या कोणाला संधी आहे. पण एक दिवस मराठी माणूस दिल्लीच्या तख्तावर बसेल असे ते म्हणाले. मला कोणत्याच पदाची महत्वकांक्षा नाही. ज्या दिवशी नगरसेवक झालो, त्यादिवशी असे वाटले की यापेक्षा मोठे काय असू शकतो. परत महापौर झालो, आमदार झालो असे फडणवीस म्हणाले. मुख्यमंत्री होईल असे कधी स्वप्नात देखील वाटले नव्हते. मी फार समाधानी आहे. जे काही मिळाले ते भरपूर आहे. क्षमतेपेक्षा पक्षाने मला जास्त दिले असल्याचे फडणवीस म्हणाले. पक्ष जी जबाबदारी देऊल त्यामध्ये 100 टक्के द्यायचे असेच माझे काम असल्याचे फडणवीस म्हणाले.

Team Global News Marathi: