‘दुःख झालं, मनावर दगड ठेवून केंद्रीय नेतृत्वाचा निर्णय मान्य केला पण..’;

 

पनवेलमध्ये भाजप कार्यकारणीची बैठक सुरू आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि प्रवीण दरेकरही उपस्थित आहेत. यावेळी राज्यातील सत्तातराबद्दल चंद्रकांत पाटील यांनी महत्त्वाचं विधान केलं. मनावर दगड ठेवून आपण सर्वांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतला, असं ते यावेळी बोलताना म्हणाले.

‘नारायण राणेंना संपवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी सुपारी दिलेली आणि आता एकनाथ शिंदे..’ नितेश राणेंचा गंभीर आरोप चंद्रकांत पाटील म्हणाले, की अक्षरशः मनावर दगड ठेवून आपण आणि देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय नेतृत्त्वाने दिलेला निर्णय मान्य केला. केंद्राने दिलेल्या निर्णयानुसार एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री केलं.

याचं दुःख पचवून आपण सर्व आनंदाने पुढे गेलो आणि हा निर्णय स्वीकारला कारण राज्याचा गाडा पुढे हाकायचा होता. हे सरकार सत्तेत येणं खूप गरजेचं होतं. मोहन भागवत यांच्यावर टीका करण्याची त्यांची मजल गेली. त्यामुळे हे खूप गरजेचं होतं, असंही ते म्हणाले पुढे ते म्हणाले, की सलग पाच वर्षे त्यांनी यशस्वीपण मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारली. यानंतर त्यांना उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारावी लागत आहे. पुढे ते म्हणाले, की जेव्हापासून शपथ घेतली तेव्हापासून आपण सर्व मुंबईत आहोत.

ममता बॅनर्जींच्या सरकारमधील या मंत्र्याला ईडीकडून अटक

आदित्य ठाकरे यांनी बोलताना थोडं भान ठेवाव, पुन्हा रामदास कदमांनी सुनावले

Team Global News Marathi: