सेनेने वयक्तिक टीका बंद केली नाही तर मलाही प्रहार करावा लागेल

 

कणकवली | भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा आज कणकवलीत आलेली असताना त्यांनी विविध विषयांवर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी नारायण राणेंनी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केलेल्या टीकेवर आपल्या शैलीत जोरदार प्रतिउत्तर देत गंभीर इशारा दिला होता.

‘माझ्या जनआशीर्वाद यात्रेत मांजर आडवी गेल्यासारखे मध्ये-मध्ये काही अपशकुन झाले. त्यानंतर आता अग्रलेख येत आहेत. कोणाच्या मुलांवर बोलण्यापेक्षा आपली मुले किती पराक्रमी आहेत. हे त्यांनी पहावं. संजय राऊत तुमच्या मालकाची मुलं काय करीत आहेत ते आधी पहा. संजय राऊत आम्हाला बोलायला प्रवृत्त करीत आहेत. राऊत यांच्यामुळे शिवसेना वाढत नाहीये. ती अधोगतीकडे चालली आहे. ‘सामना’ची प्रतिमा बौद्धिक वर्गात चांगली नाही. असा घणाघात राणे यांनी केला.

‘राऊत यांनी माझ्या मुलांची बरोबरी करू नये. माझे त्यांच्यावर नियंत्रण आहे. संजय राऊत यांनी वयक्तिक गोष्टींवर बोलणं थांबवलं नाही तर, मलाही ‘प्रहार’मधून लिखान सुरू करावे लागेल. कोणाचं बसणं उठणं कोणाबरोबर आहे. कोणाचे कोणत्या खटल्यांशी संबध आहेत. हे सगळं बाहेर काढेन. असा इशाराही राणे यांनी यावेळी दिला. अनिल परब पोलिसांना असे आदेश देतात जसे की, पंतप्रधान किंवा राष्ट्रपती आहेत. पोलिसांना मला अटक करण्यासाठी दम भरतात. शिवसेनेत नारायण राणे विरूद्ध बोलले की पदे मिळतात असा टोला सुद्धा लगावला होता.

Team Global News Marathi: