राम मंदिराची चिंता नको! तुम्ही अजान स्पर्धाची काळजी करा-भातखळकरांची टीका

ज्यांच्या ताटात अबूची बिर्याणी, इटालियन मातोश्रींचा पिझ्झा आणि धोरणी साहेबांची वांगी आहेत, भातखळकरांची टीका

राम अयोध्येचा राजा होता. त्याच्या मंदिरासाठी युद्ध झाले. शेकडो कारसेवकांनी आपले रक्त सांडले. बलिदान दिले. त्या अयोध्येच्या रामाचे मंदिर वर्गणीतून बांधायचे? असा परखड सवाल शिवसेनेनं उपस्थितीत केला आहे. तसंच,’श्रीरामाचे भव्य मंदिर हे एखाद्या राजकीय पक्षाच्या राजकीय लाभासाठी बनत नसून ते देशाच्या हिंदू अस्मितेची पताका फडकविण्यासाठी बांधले जात आहे. अशी टीका शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना अग्रलेखातुन राऊत यांनी भाजपवर केली आहे. आत त्यांच्या या टीकेला भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी टीका केली आहे.


.
देशातील रामभक्तांच्या सहकार्याने भव्य राम मंदीर उभे राहीलच, तुम्हाला त्याची चिंता नको! तुम्ही अजान स्पर्धाची काळजी करा असे ट्विट करून भातखळकरांनी सेनेला टोला लगावला आहे.

 

तसेच पुढे आणखी एक ट्विट करून ते म्हणतात की, “भातखळकर म्हणाले,ज्यांच्या ताटात अबूची बिर्याणी, इटालियन मातोश्रींचा पिझ्झा आणि धोरणी साहेबांची वांगी आहेत, त्या नव ब्रिगेडी बाटग्याना राम वर्गणीच्या नावाने करपट ढेकर आले नसते तरच आश्चर्य होते.” असे त्यांनी म्हटले आहे.

 

ग्लोबल न्युज नेटवर्क: