कोरोनाच्या निमित्यानं खच्चीकरण करु नका
कोराना व्हायरसनं देशच नाही,तर जग धास्तावले आहे.दिवसेंदिवस कोरोना रुग्णाची संख्या वाढत आहे.तसाच मृत्यूचाही आकडा वाढत आहे.अनेकांचे रोजगार बंद आहेत.त्याचबरोबर अनेक रुग्ण पॉजिटिव्ह निघत आहेत.काही लोकं आताही काळजी घेत आहेत.तर काही लोकं आताही काळजी घेतांना दिसत नाहीत.
कोरोना होवू नये म्हणून काहीजण जनजागृती करीत आहेत.ते करणे साहजिकही आहे.पण काही मात्र त्यात आतिशयोक्तीही करतांना दिसत आहेत.ती गोष्ट न आवडणारी गोष्ट आहे.
आतिशयोक्ती याचा अर्थ दुस-याला आवश्यकता नसतांना ज्ञान सांगणे.बालिश बहू बायकात बडबडल्यासारखं.स्वतःत मात्र कोणतंही कर्तृत्व नसतांना माझ्यात कर्तृत्व आहे असा विचार करुन ती कर्तृत्वाची गोष्ट फुगवून सांगणं.
आम्ही शिकलो.कोणी उच्च शिक्षण घेतलं.त्यांना तर असं शहाणपण मोठ्या प्रमाणात आलं.कारण या शिक्षणासोबतच आमच्यातील माणूसकी नष्ट झाली.त्याचं कारणही तसंच घडलं.या उच्च शिक्षणासोबतच आम्हाला मिळालेल्या नोकरीनं पैसा वाढल्यानं आमच्यात जो अहंकारीपणा आला.तो अहंकारीपणा माणूसकीची खिल्ली उडवीत सुटलाय अशी गत समाजात झाली आहे.तसेच जी मंडळी सामान्य शिकली आहेत.तिही मंडळी अर्ध्या हरकंडात पिवळी झाल्यागत वागतांना दिसत आहेत.
शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे म्हणतात.जो पिणार तो गुरगुरणार.तशी आजची पिढी शिकून जास्तच गुरगुरायला लागली.ज्या ठिकाणी गुरगुरायचं त्या ठिकाणी आजची पिढी गुरगुरत नाही.ज्या ठिकाणी आवश्यकता नाही,त्या ठिकाणी आधी गुरगुरतांना दिसते.कार्यालयात नोकरी करतांना बॉस जर बदमाश असेल तरी ही शिकलेली मंडळी तो अन्याय जरी करीत असला तरी तो अन्याय मुकाट्यानं सहन करतात.आवाज उठवीत नाही.मात्र त्याच्या हाता खालच्या कर्मचा-यांना ते अनन्वीत वेदना देत असतात.गुलाम असल्यागत.त्यामुळं यालाच शिक्षण म्हाणायचं का?असाही प्रश्न पडतो.
मृत्यू…….मृत्यू हा आज ना उद्या येणारच.तुम्ही घाबरलात तरी मृत्यू येणार.अन् नाही घाबरलात तरी मृत्यू येणार.तुम्ही काचबंद पेटीत जरी लपून बसलात,तरी मृत्यू येणार.मग तो कोरोनाच्या रुपानं असो की इतर बाबीनं असो.कोणाजवळ कितीही मोठं शिक्षण असलं,कितीही पैसा असला तरी मृत्यूनं त्याला सोडलेलं नाही.मृत्यूची वेळ आणि घटिका ठरलेली आहे.तशी मानसिकता कोरोनाबाबतही आपल्या मनात निर्माण करायला हवी.इतर आजारानं मृत्यू येत नव्हता काय? हाही प्रश्न आपल्या मनात निर्माण करुन कोरोनाशी दोन हात करायला हवं.
कोरोनाच्या बाबतीत सांगायचं झाल्यास एक व्यक्ती दुस-याला मार्गदर्शन करतांना सांगत होता.
‘काळजी घ्या बरं.कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत.कोरोना रुग्णाचे फार हाल होतात.रुग्णालयात खाटा शिल्लक नाहीत.मास्क लावा.सानिटायझर लावा.सारं काही.तुम्ही जर काळजी घेणार नाही तर तुमच्यापासून आम्हालाही होईल.कोरोनाच्या संपर्कात येवू नका.’
असे असतांना डॉक्टरांनी तसा विचार जर केला तर कोरोना रुग्ण सुधारणार काय? त्याच्यामते, तो फार स्वतःची काळजी घेत असेल असे वाटत होते.मग काळजी जर घेत आहे.तर मग घरातून बाहेर पडलाच कसा? हा प्रश्न जो त्याचं ऐकत होता.त्याला पडला.कारण लॉकडाऊन सुरुच होतं.काही ठिकाणी अद्यापही लॉकडाऊन उघडलेलं नव्हतं.
वर्तमानकाळात अशी पिढी निपजली आहे की ‘जे लोका सांगे ब्रम्हज्ञान आपण कोरडे पाषाण’ असल्यागत वागत असतात.आपण स्वतः तसे वागत नाही.पण शहाणपणा नक्कीच सांगतात.तसेच जे शहाणपणा सांगत आहेत.कोरोना त्यालाच छळत आहे.सामान्य माणसांपेक्षाही कितीतरी जास्त प्रमाणात.आज अमिताभ बच्चनलाही कोरोना झालेला होता.मग त्याला का व्हावा कोरोना? कारण तो तर दूरदर्शनसारख्या माध्यमातून मास्क वापरा.सानिटायझर वापरा अशी जाहीरात करीत होता.
कोरोना हा आजार जरी असला तरी काही प्रमाणात हा आजार मानसिकतेचं खच्चीकरण करीत आहे.ह्या आजारानं लोकात दहशत आहे.एखाद्याला कोरोना झालाच तर त्याला वाळीत टाकलं जात आहे.आपल्यालाही होईल ही भीती आहे.सर्वत्र कोराना रुग्णाबाबत भेदभाव आणि बहिष्कार.जर असाच भेदभाव डॉक्टर आणि परीचारीकांनी केला.असाच भेदभाव पोलिसांनी केला.तर खरंच कोराना आजार बरा होईल की वाढेल.नक्कीच वाढणारच.मग हे दुर्बलीकरण का? मानसिकता सबळ करण्याचं काम कोणीच करीत नाहीत.उलट कोरोनाच्या रुपानं मानसिकतेचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न होत आहे.
कोरोनाबाबत अपप्रचार करु नये म्हणून मिडीया व प्रशासन जागृत आहे.पण सामान्य पातळीवर कोरोनाचा अपप्रचार सुरु आहे.कोरोना होवू नये म्हणून बहुतःश सर्वच लोक स्वतःची काळजी घेत आहेत.असं असतांना काही लोकं उगाच त्याचा बाऊ करीत असतांनाही दिसत आहेत.कोरोनाच्या आजाराबाबत मानसिकता तयार करण्याचं काम कोणीच करतांना दिसत नाहीत.कोरोना झालाच तर घाबरण्याचं कारण नाही असं कोणी सांगत नाही.मात्र घाबरवण्याच्या गोष्टी मुळात जास्त प्रमाणात सुरु असलेल्या दिसतात.
लॉकडाऊन लावायचं! केव्हापर्यंत लावायचं.उपासानं मरत असेपर्यंत.हे असं उपासानं मरण्यापेक्षा कोरोनानं मरण पावलेलं चांगलं.कारण कितीही कोरोनाला घाबरवून स्वतःला कैदेत ठेवलं,तरी कोरोनाचा संपर्क होवून आपण केव्हा कोरोनाबाधीत होवू हे काही सांगता येत नाही.तेव्हा माणसानं कोरोनाला न घाबरता हिंमतीनं कोरोनाशी लढायला हवं.जमेल तेवढी काळजी घ्यायला हवी.बाकीच्या गोष्टी नशीबावर ठेवाव्यात.असं जर आपण करणार नाही.तोपर्यंत आपण कोरोनाशी लढू शकणार नाही व देशाला कोरोनामुक्तही करु शकणार नाही.कारण कोरोनाच्या संपर्कात आल्याशिवाय आपल्या शरीरात कोरोनाशी लढण्याची प्रतिकारशक्ती तयार होणार नाही.म्हणून कोरोनाच्या पाश्वभुमीवर कोणी कोणाचं खच्चीकरण करु नये.
अंकुश शिंगाडे ९३७३३५९४५०