देवेंद्र फडणवीसांना या प्रकरणात ओढण्याचे परिणाम नवाब मलिक यांना भोगावे लागेल – चंद्रकांत पाटील

 

राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन थेट या प्रकरणात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांना ओढले होते. देवेंद्र फडणवीस हे राज्यातील ड्रग्जच्या उद्योगांचे मास्टर माइंड आहेत, असा धक्कादायक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी फडणवीस यांच्यावर केला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या ड्रग्ज प्रकरणातील सहभागाचा सीबीआय आणि इतर केंद्रीय मंत्री संस्थांच्या माध्यमातून तपास केला जावा अशी मागणी नवाब मलिक यांनी केली आहे आता मलिक यांनी केलेल्या टिकेनंतर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे.

पाटील म्हणले की, नवाब मलिक समीर वानखेडेंवर जे आरोप करत आहेत त्याच्यातून येणाऱ्या परिणांमांची काळजी करावी पण भाजपाला आणि देवेंद्र फडणवीस यांना यामध्ये ओढण्याचे परिणाम खूप भोगावे लागतील. ज्यावेळी पुराव्याशिवाय बोलतो तेव्हा पुरावे नाही सापडले तर जी स्थिती होते ती फार वाईट असते. महाविकास आघाडी प्रत्येकवेळी असा चेहरा उभा करत आहे ज्यातून मूळ सामान्यांच्या प्रश्नांपासून लोकांचे लक्ष विचलित करण्याचे काम सुरु आहे.

पुढे ते म्हणाले की, महाराष्ट्रात महापूरामुळे पीक, जमिन वाहून गेली, महिलांवरील अत्याचारांचे गुन्हे नोंदवले जात आहेत. या प्रश्नांवर बोलण्यासाठी त्यांच्याकडे काही नसल्यामुळे अशा प्रकारचे बेछूट आरोप करण्याचा प्रयत्न चालला आहे. मंत्रीमंडळातील अर्ध्ये मंत्री गायब तरी आहेत किंवा त्यांच्यावर आरोप तरी आहेत. अनिल देशमुखांची काळजी करण्याआधी ते वानखेडेंची काळजी करायला लागले आहेत. वानखेडेंच्या मागे समाज पूर्णपणे ठामपणे उभा राहिल. भाजपा अन्याविरुद्ध संघर्ष करणाऱ्यासोबत आहे,” असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

Team Global News Marathi: