दिल्लीवरचे आरोप थांबवा; शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर यांचा ठाकरेंना इशारा

 

मुंबई | अडीच वर्षे दिल्लीवर आरोप सुरू होते. आता हे राजकारण थांबले पाहिजे, असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते आ. दीपक केसरकर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व त्यांच्या समर्थकांना दिला आहे. राज्य आणि केंद्राच्या चांगल्या संबंधांमुळे राज्याचा गाडा सुरळीत चालू शकतो, याचा विचार गेली अडीच वर्षे केला नाही असेही ते म्हणाले.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे. त्यांच्याबद्दल आम्ही काहीच बोलणार नाही. त्यांच्यावर टीकाही करणार नाही, असे केसरकर यांनी आधी म्हटले होते. मात्र, आज ते पत्रपरिषदेत ते म्हणाले की, त्यांचे प्रवक्ते रोज सकाळी उठून केंद्रावर टीका करत होते. त्यामुळे केंद्रासोबत असलेले संबंध बिघडले. गेली अडीच वर्षे राजकारण सुरू होते.

तसेच दिल्लीवर आरोप सुरू होते. आता हे राजकारण थांबले पाहिजे. त्यांनी, हातकणंगलेचे शिवसेना खासदार धैर्यशील माने यांच्या घरावर मोर्चा काढला. आमच्यासोबत आलेल्या खासदारांच्या घरांवर मोर्चे काढले जात आहेत. त्यांना जाब विचारले जात आहेत. लोकांना का भडकवताय? असा थेट सवाल त्यांनी उद्धव यांना केला.

आजवर कालपर्यंत कुठेही न फिरणारे आता फिरू लागलेत. मंत्रालयातील सातव्या मजल्यावरील कार्यालयात ते किती वेळा गेले आणि काय काम केले? बांधावर जा म्हणून सांगायचे. मग, आता कार्यकर्त्यांना सांगून बांधावर जायला का सांगत नाहीत? असा सवाल त्यांनी आदित्य ठाकरे यांचे नाव न घेता केला.

जीवे मारण्याच्या धमकीनंतर पहिल्यांदाच सलमान सार्वजनिक कार्यक्रमात

Team Global News Marathi: