दिल्लीतील बॉसला खुश करण्याचा राज्यपालांचा चंग, जयंत पाटलांनी साधला निशाणा

 

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पुन्हा वादग्रस्त वक्तव्य करत मराठी माणसाला डिवचलं आहे. राज्यपालांच्या वक्तव्यानंतर शिवसेनासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुद्धा आक्रमक झालेला पाहायला मिळत आहे. काही महामहीम व्यक्तींनी त्यांच्या दिल्लीतील बॉसना खुश करण्याचा चांगलाच चंग बांधलेला दिसत आहे. परराज्यातील व्यक्तींमुळं मुंबईत पैसा नसून राज्यातील मराठी कष्टकऱ्यांच्या कष्टावर मुंबई उभी असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलं आहे.

पाटील म्हणाले की, घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तींनी जपून बोलण्याचा संकेत देशातील सार्वजनिक जीवनात आहे. मात्र, काही महामहिम व्यक्तींनी त्यांच्या दिल्लीतील बॉसना खुश करण्याचा चांगलाच चंग बांधलेला दिसत आहे. परराज्यातील व्यक्तींमुळे मुंबईत पैसा नसून, राज्यातील मराठी कष्टकऱ्यांच्या कष्टावर मुंबई उभी असल्याचे जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

तसेच दुसऱ्या राज्यांबद्दल प्रेम असणाऱ्या व्यक्तींनी खुशाल तिकडे जाऊन रहावं. महाराष्ट्राच्या राजधानीत पंचतारांकित व्यवस्थेत राहून महाराष्ट्रातील मराठी माणसांचा अपमान मा. राज्यपाल महोदय करत असल्याचे पाटील म्हणाले. महाराष्ट्र भाजपाला राज्यपालांचे हे वक्तव्य मान्य आहे का ? राज्यपाल महोदय मराठी माणूस, महाराष्ट्राचा गौरवशाली व जाज्वल्य इतिहास यांचा वारंवार अपमान का करत आहेत ? असे सवालही जयंत पाटील यांनी भाजपला केले आहेत.

Team Global News Marathi: