ग्लोबल न्यूज – राज्यात कोरोना संसर्गाचा वेग पुन्हा एकदा जोर धरु लागला असून दररोज विक्रमी कोरोना रुग्णांची वाढ होत आहे. राज्यात आज दिवसभरात 25,681 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. रुग्णांच्या संख्येत निरंतर होणारी वाढ नागरिकांची चिंता वाढवत आहे.
आरोग्य विभागाच्या हावाल्याने एएनआयने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 24 लाख 22 हजार 021 एवढी झाली आहे. त्यापैकी 21 लाख 89 हजार 965 जण कोरोनामुक्त झाले आहेत. आज दिवसभरात 14 हजार 400 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.
नव्यानं वाढ होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढल्याने राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या देखील वाढली आहे. सध्या राज्यात राज्यात सध्या 1 लाख 77 हजार 560 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात सर्वाधिक सक्रिय रुग्णांची संख्या पुण्यात आहे. त्याखालोखाल नागपूर, मुंबई, ठाणे, नाशिक आणि जळगाव या जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या अधिक आहे.
राज्यात आज दिवसभरात 70 रुग्णांचा मृत्यू झाला. आजवर 53 हजार 208 रुग्ण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 2.19 टक्के एवढा आहे. तर, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 90.41 टक्के एवढे झाले आहे. राज्यात सध्या 8 लाख 670 हजार 333 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 7 हजार 848 संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.