राज्यावर अस्मानी संकट, मुख्यमंत्र्यांची गृहमंत्री अमित शाहांसोबत महत्त्वपूर्ण बैठक सुरू

सध्या संपूर्ण राज्यात कोरोना संसर्ग झपाट्याने वाढताना दिसत आहे. तसेच मृत्यूचे प्रमाणही वाढलेले दिसून येत आहे. एकीकडे राज्य सरकार कोरोनाच्या संकटाशी लढत असताना राज्यावर आता अस्मानी संकट उभं राहील आहे. अरबी समुद्रातील तौत्के चक्रीवादळ आता हळूहळू उग्र रुप धारण करत असून राज्याच्या किनारपट्टीकडे सरकत आहे. एकीकडे कोरोना संसर्गाचं संकट असताना चक्रीवादळाच्या या नव्या संकटामुळे राज्य दुहेरी कात्रीत सापडलं आहे. चक्रीवादळाच्या नैसर्गिक आपत्तीशी लढण्यासाठी राज्यानं तयारी केली अजून धोक्याच्या ठिकाणी एनडीआरएफच्या जवानांना तैनात केलं आहे.

त्याचबरोबर मुंबईतील समुद्र किनाऱ्यापासून जवळच्या कोविड सेंटरमधील रुग्णा इतरत्र हलवण्यात येत आहेत. तौत्के चक्रीवादळ केरळ, कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र आणि गुजरात या दिशेनं पुढं सरकत आहेत. या आपत्कालीन परिस्थितीचा आढवा घेण्यासाठी राज्यसरकार आणि केंद्र सरकार यांच्यात दूरदृश्य प्रणालीद्वारे महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत इतर वरिष्ठ पदाधिकारी सहभागी झाले आहेत.

या बैठकीत “तोत्के” चक्रिवादळनं निर्माण केलेल्या आपत्कालीन परिस्थितीवर महत्त्वाची चर्चा झाली. यावेळी राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटेही उपस्थित होते. या बैठकीत कोणती महत्व[उरण निर्णय घेण्यात आलेले आहे या संदर्भातील माहिती आद्यपही समोर आलेली नाही.

Team Global News Marathi: