मुंबई : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन 14 आणि १५ डिसेंबर रोजी मुंबईत घेण्यात येणार आहे. या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं आहे.
राज्यात कोरोनाच्या काळात मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव आपल्याला पहायला मिळाला. देशातील कोरोना बाधित मृतकांपैकी राज्यात सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. जवळपास ४८ हजार मृत्यू राज्यात झाले आहेत. देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यावर, मृत्यूच्या संख्येत घसरण झाल्यानंतर आजही सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रातच होत आहेत ही दुर्दैवाची परिस्थिती आहे. खरं म्हणजे संपूर्ण कोरोना काळाचा पंचनामा करण्याची गरज आहे. संकट काळ असल्यामुळे आम्ही यावर बोलणं टाळलं पण ज्याप्रकारचा भ्रष्टाचार कोरोनाच्या काळात पहायला मिळाला तो खरोखर अतिशय संताप आणणारा भ्रष्टाचार आपल्याला पहायला मिळाला. सरकार स्वत: स्थिती हाताळणीचा दावा का करते, हे अनाकलनीय आहे.
या सरकारला चर्चाच होऊ द्यायची नाही.
त्यामुळे केवळ 2 दिवसांचे अधिवेशन.
आज शेतकऱ्यांचे प्रश्न मोठे आहेत.
अनेक ठिकाणी कवडीची मदत शेतकऱ्यांना मिळालेली नाही: देवेंद्र फडणवीस @Dev_Fadnavis— @OfficeOfDevendra (@Devendra_Office) December 13, 2020
…म्हणून दोन दिवसांचे अधिवेशन
राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन यंदा मुंबईत होत आहे. हे अधिवेशन १४ आणि १५ डिसेंबर या दोनच दिवसांत होणार आहे. यावर देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं, या राज्य सरकारला चर्चाच होऊ द्यायची नाहीये आणि त्यामुळे केवळ दोन दिवसांचे अधिवेशन घेत आहेत.
कोरोनाच्या संपूर्ण काळाचा पंचनामा करण्याची गरज आहे. या काळातही भ्रष्टाचार हा संताप आणणारा.
48 हजार मृत्यू राज्यात झाले आहेत.
सरकार स्वतः स्थिती हाताळणीचा दावा का करते, हे अनाकलनीय आहे: देवेंद्र फडणवीस @Dev_Fadnavis— @OfficeOfDevendra (@Devendra_Office) December 13, 2020
महिला अत्याचारात मोठी वाढ झाली आहे : देवेंद्र फडणवीस
राज्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचारात मोठी वाढ झाली आहे. आम्हाला ऐकायला मिळालं की, शक्ती कायद्याला कॅबिनेटने मान्यता दिली आहे. कायदा काय आहे ते पाहिल्याशिवाय त्यावर प्रतिक्रिया देता येणार नाही. या अधिवेशनात ते चर्चेसाठी आणणार आहेत का माहित नाही आणणार असले तर त्याच्या चर्चेला वेळ कसा देणार आहेत.
राज्य विधिमंडळाचे अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित पत्रपरिषदेत माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस पत्रकारांशी संवाद साधत आहेत. @Dev_Fadnavis https://t.co/0IuTBDcvYN
— @OfficeOfDevendra (@Devendra_Office) December 13, 2020
या कायद्यावर चर्चा कशी होणार आहे. आमची मागणी आहे यावर सविस्तर चर्चा व्हायला हवी. महत्वाचा कायदा आहे आणि त्यावर योग्य प्रकारची चर्चा व्हायला पाहिजे असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
‘https://twitter.com/Devendra_Office/status/1338075403760517120?s=19
राज्यातील सामाजिक घडी विस्कटता कामा नये : देवेंद्र फडणवीस
आज राज्यातील सामाजिक घडी ही कुठेतरी विस्कटत आहे. एकिकडे मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न या सरकारच्या एकूणच भूमिकेमुळे सर्वोच्च न्यायालयात स्थिगित होऊन मराठा समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवण्याचं काम सरकारकडून झालं आहे. कुठल्याही प्रकारे मराठा आरक्षणाच्या संदर्भात ठोस भूमिका या सरकारने घेतली आहे आणि म्हणूनच आज ही परिस्थिती आहे की, सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती या कायद्याला मिळाली.
हे सुरू असताना सरकारमधील मंत्री आणि सरकारमधील प्रतिनिधी हे ओबीसी आरक्षणाच्या संदर्भातही प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत. मला तर आश्चर्य वाटत आहे की सरकारमधलेच मंत्री मोर्चे काढत आहेत. मंत्र्यांना मोर्चे काढण्याचा अधिकार नसतो त्यांनी मंत्रिमंडळात जावून ठराव करुन घेतला पाहिजे आणि ओबीसी आरक्षणाला कुठलाही धक्का लावणार नाही असं मंत्रिमंडळाच्या माध्यमातून नागरिकांसमोर आणलं पाहिजे.
मराठा आरक्षणावर सरकार अपयशी.
सरकारच्या दुर्लक्षामुळे सर्वोच्च न्यायालयात स्थगिती मिळणे हे दुर्दैवी.
आज ओबीसी आरक्षण संदर्भात मंत्रीच प्रश्न उपस्थित करीत आहेत. समाजामध्ये भयाचे वातावरण. ते तत्काळ दूर करणे गरजेचे: देवेंद्र फडणवीस @Dev_Fadnavis— @OfficeOfDevendra (@Devendra_Office) December 13, 2020