नवी दिल्ली | कोरोना व्हायरस जगभरात झपाट्याने वाढत आहे. दरम्यान कोरोनाचा प्रसार रोखण्या भारताने आपली आक्रमक कारवाई सुरू ठेवावे असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. भारतात आतापर्यंत 499 कोरोनाचे रुग्ण आठळले आहे. याचा प्रसार रोखण्यासाठी 548 जिल्ह्यांमध्ये लॉकडाउन घोषित करण्यात आले आहे.
काय म्हटलं आहे रेयान यांनी?
” चीनप्रमाणेच भारत हा देखील बहुसंख्य लोक असलेला देश आहे. या देशात करोनाचं जे संकट ओढवलं त्यानंतर आक्रमक निर्णय घेण्यात आले. करोनाशी लढा देण्यासाठी घेण्यात आलेले निर्णय योग्यच आहेत. लोकांच्या आरोग्य जपण्याच्या आणि जीव वाचवण्याच्या दृष्टीने भारताने घेतलेले निर्णय योग्य आहेत. भारताने ज्या प्रमाणे देवी आणि पोलिओ या दोन रोगांशी लढा दिला तसाच लढा देण्याची भारताची वृत्ती आत्ताही दिसून येते आहे. ”
Who भारताचे कौतुक केले आहे. कोरोना थांबवणं आता तुमच्या हाती आहे त्यांनी म्हटलं आहे. भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या 499 पर्यंत पोहचली आहे. कोरोना वाढू नये यासाठी भारताने देशभरातल्या 548 जिल्ह्यांमध्ये लॉकडाउन घोषित केले आहे. भारत कोरोनाचा प्रादु्र्भाव रोखण्यासाठी उचलत असलेली पावलं कठोर आहे. मात्र ही योग्य आहे. या प्रकारची पावलं उचलणं भारताने सुरु ठेवलं पाहिजे असंही WHO ने म्हटलं आहे. WHO चे कार्यकारी संचालक मायकल जे रेयान यांनी भारताचं कौतुक केलं आहे.