कोरोना हकीकत:चला तर मग तयार व्हा आता सगळं उघड करायची वेळ आली आहे.; वाचा एका पत्रकारांच्या अनुभवातून
आता सांगतोय त्या रुग्णालयात घडलेली हकीकत….
मला २९ जुलै ला एडमीट करण्यात आले. मी प्रायव्हेट हॉस्पिटल आणि स्वतंत्र रूमची मागणी केली होती त्यावरून मला हे हॉस्पिटल निवडावे लागले.
दोन वेळा सिटी स्कॅन, दोन वेळा एक्स रे, दोन वेळा सीबीसी, एक वेळा ब्लड कल्चर, एक वेळा स्वाब तपासणी अशा एकूण ८ तपासणी झाल्या.. पण एका तपासणीचा ऑफिशियल रिपोर्ट मिळेल तर शपथ!
मी बायको आणि मुलगा अशी तिघांची मिळून तीन लाखाच्या वर बिल वसूल केले गेले पण एकाची पावती मिळेल तर शपथ! रक्कम समजली ती विमा कंपनीच्या मेल मधून…
औरंगाबाद मधील #वायएसके_हॉस्पिटलमध्ये माझा मुक्काम एकूण १४ दिवस होता पण यात मला नेमके काय झालंय ते कोणीच आणि कधीच सांगितले नाही..
मी काही विचारण्याचा प्रयत्न केला आणि माझी सुटका कधी असे विचारले तर उत्तर ठरलेले. ” मिस्टर कुलकर्णी, तुम्ही कोणालाही फोन केला तरी तुमचा डिस्चार्ज माझ्या हाती आहे”
औरंगाबादचे #जिल्हाधिकारी, #मनपाच्या #वैद्यकीय_अधिकारी यांना फाट्यावर मारणे सुरू होते.
याचवेळी आणखी कांहीं रुग्ण असाच संघर्ष करत होते. दिल्ली जाताना विमानतळ तपासणीत पॉजीटीव्ह सापडलेला रुग्ण रिपोर्ट साठी तळमळत होता पण त्याला गप्प करण्यात आले. रिपोर्ट दिलाच नाही…
श्री राहुल सोनवणे हे आपल्या आईसह याच हॉस्पिटलमध्ये एडमीट होते. त्यांना ४० हजार रुपयांचे एकच इंजेक्शन आणायला लावले पण हे इंजेक्शन हरवले चक्क गायब झाले आणि निर्लज्ज पद्धतीने हे व्यवस्थापन हरवले असे सांगत होते. आम्ही तुम्हाला बिल देऊ तुम्ही इन्शुरन्स कंपनीकडून प्रतिपूर्ती करून घ्या असा सल्ला मिळत होता.
आणखी एक पेशंट जे वोखार्ड मध्ये कामाला आहेत त्यांना विम्याशिवाय १८ हजार भरण्याची सक्ती केली गेली आणि त्या शिवाय डिस्चार्ज देण्यात आलाच नाही. दीड दिवस १८ हजार रूपये मिळावेत यासाठी थांबवून ठेवले गेले.
मी दहा दिवस संपल्यावर मला सोडावे अशी विनंती केली पण मला सोडले नाही उलट ५ हजार ४०० रुपये किंमत असलेली ५ इंजेक्शन आणायला सांगितलं गेलं. त्यातील एक दिलेच नाही आणि ते मिस्प्लेस (हरवले) असे सांगण्यात आले. नेमकी महागाची इंजेक्शन हरवतात कशी? असा प्रश्न पडतोच….
(अजूनही मला ते इंजेक्शन परत मिळाले नाही)
दहा दिवस पूर्ण झाल्यावर मी मनपाच्या आरोग्य अधिकारी व जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधला पण त्यांना देखील फाट्यावर मारत मला पुढे मला चार दिवस सुटका दिलीच नाही.
मला न झालेला आजार झाला असे सांगत माझीच फाडण्याचा प्रयत्न झाला. या हॉस्पिटल चे उदघाटन ज्यांनी केले होते त्यांच्याशी बोललो पण त्यांच्या शब्दाला देखील कचरा कुंडीत टाकण्यात आले. आणि नेत्यांना बोलून देखील फायदा नाही हे मला ऐकवले गेले.
इतकी मुजोरी कशामुळे? कुठून येते ही शक्ती असा प्रश्न मला पडला होता. नंतर समजले की #भाजपाचे नवनिर्वाचित राज्यसभा सदस्य यांच्या जवळच्या नातलगाचे हे हॉस्पिटल आहे.
याच जवळीक मुळे या वाय एस के हॉस्पिटलमध्ये #पीएमकेअर्स ची पाच व्हेंटिलेटर देखील आलेली आहे.
आमच्याच देणगीतून घेतलेली #व्हेंटिलेटर आमच्याच लुटीसाठी वापरली जात आहेत हे देखील समजले आणि पहिल्यांदा #पीएमकेअर्सला मोठी #मदत दिल्याबद्दल स्वतःचा राग देखील आला.
ही लूट खुले आम सुरू आहे.
१) माझी बायको आणि मुलगा एकाच रूम मध्ये एडमीट होती रूम न २००९ पण दोघांना वेगवेगळी रूम दाखविण्यात आली आणि प्रत्येकाचे रूम रेंट वेगळे घेण्यात आले.
२) मला एकही दिवस आय सी यु मध्ये ठेवण्यात आले नाही पण तीस हजार रुपये आयसीयू चार्ज घेण्यात आला.
३) आमचा तिघांचा कालावधी जवळपास चार दिवस सारखा होता पण पण पीपीई किटच्या बिलात आमच्यात देखील विभागणी केली गेली नाही.
४) सतत भय दाखविणे, दम देणे अशी कृती या हॉस्पिटलच्या सी ई ओ श्रीमती खेडकर करत होत्या.
५) त्या सतत धमकीवजा बोलत माझे कोणीच काही वाकडे करू शकत नाही ही भाषा बोलत होत्या. ही हिंमत खासदार पदामुळे होती की अन्य कोणत्या कारणामुळे हे स्पष्ट होणे आवश्यक आहे.
६) बिल अप्रुवल मिळण्याच्या नावाखाली एक रात्र आणि अर्धा दिवस मला हॉस्पिटलमध्ये ओलीस ठेवण्यात आले. डिस्चार्ज कार्ड तयार केले पण सोडले नाही याला काय म्हणावे? मी माझे सामान ठेवायला गाडीकडे गेलो तेंव्हा मीच पळून जातोय असा आरोप या सी ई ओ मॅडमनी केला.
७) माझ्या सुटकेचा प्रयत्न अनेकांनी केला पण दाद ना फिर्याद कोणालाही मोजले गेले नाही.
या बाबत अधिक लिहीत आहेच
हॉस्पिटल : वाय एस के हॉस्पिटल औरंगाबाद
डॉकटर : श्रीमती वृषाली खेडकर
टीप: या दाव्यांचा पुष्ट्यर्थ सर्व पुरावे उपलब्ध आहेत जे माझ्या रीतसर तक्रारीत देत आहे.
COVIDTREATMENT #privet_hospital #doctor #लूट
सुशील कुलकर्णी यांच्या फेसबुक वॉलवरून साभार