कोरोनामुळे १० वी आणि १२ वी’चे विद्यार्थी जूनमध्ये परीक्षा देऊ शकतात – वर्षा गायकवाड

मुंबई : शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांनी महत्वपूर्ण माहिती दिली आहे. त्यांच्या या घोषणेमुळे १० वी आणि १२ वी’च्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. दहावी बारावीच्या परीक्षा ऑफलाईन (लेखी परीक्षा) पद्धतीनुसारच होणार असल्याची माहिती गायकवाड काही दिवसांपूर्वी त्यांनी दिली होती.

मात्र या घोषणेनंतर विध्यार्थी वर्गासमोर अनेक प्रश्नन उभे राहिले होते. मात्र, आता या प्रश्नांची उत्तरंही समोर आली आहेत. दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी समोर आहे आहे. कोरोनामुळे १० वी आणि १२ वी’चे जे विद्यार्थी ठरलेल्या तारखेला परीक्षा देऊ शकणार नाहीत, त्यांच्यासाठी जूनमध्ये विशेष परीक्षा घेण्यात येणार आहे.

सदर विद्यार्थाला कोरोना झाला असेल, विद्यार्थ्यांच्या घरात, परिसरात कोरोना रुग्ण असतील आणि तो राहात असलेला भाग सील केला असेल, तर अशा विद्यार्थ्यांना आता दहावी आणि बारावीची परीक्षा देता येणार नाही. त्यांच्यासाठी जूनमध्ये विशेष परीक्षा घेतली जाणार आहे.

आताच्या परीक्षेला विद्यार्थी आला नाही तर संबंधित शाळांनी त्या विद्यार्थ्यांची माहिती शिक्षण मंडळाला द्यायची आहे. यामुळे या विद्यार्थ्यांचं वर्ष वाया जाणार नाही आणि विद्यार्थ्यांना जूनमध्ये परीक्षा देता येईल अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

 

Team Global News Marathi: