“स्वयंपाक करणारा आणि जेवणाची व्यवस्थाही भाजपने केली होती” – नवाब मालिक

 

मुंबई | उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असून भारतीय जनता पक्षाने पहिल्या टप्प्यातील निवडणुकांसाठी पहिली यादी जाहीर केली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ गोरखपूर शहर मतदारसंघातून निवडणूक लढणार आहेत. मात्र, यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि नेते नवाब मलिक यांनी योगी आदित्यनाथ यांच्या दलित कुटुंबाच्या घरी जेवण केल्यावरून जोरदार टोला लगावला आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गोरखपुरमधील एका दलित कुटुंबाच्या घरी जेवणाचा आस्वाद घेतला. नियोजित कार्यक्रमाप्रमाणे योगी आदित्यनाथ यांनी झूमिया गेट येथील गोरखपूर फर्टिलायझरमध्ये पोहोचले. येथे त्यांनी पक्षाचे कार्यकर्ता असणाऱ्या अमृतलाल भारती यांच्या घरी जेवण केले. मात्र ह्या फोटोची सोशल मीडियावर चांगली चर्चा आहे. यावरूनच आता नवाब मलिक यांनी योगी आदित्यनाथ आणि भाजपवर टीका केली आहे.

राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ट्विटरवरुन योगी आदित्यनाथांचा फोटो शेअर करत निशाणा साधला आहे. पत्रावळी आणि कुल्हडवरुनच दलिताच्या घरी जेवण करणे हा केवळ दिखावा असल्याचे स्पष्ट होत आहे. असे ऐकण्यात आले आहे की, स्वयंपाक करणारा आणि जेवणाची व्यवस्थाही भाजपने केली होती असे म्हंटले होते आता या टीकेला भाजपा काय प्रतिउत्तर देते हे पाहावे लागणार आहे.

Team Global News Marathi: