आता 15 फेब्रुवारी पासून राज्यातील महाविद्यालये सुरू होणार..

ग्लोबल न्यूज – राज्यातील महाविद्यालयं सुरु करण्यास परवानगी राज्य सरकाने परवानगी दिली आहे.त्यानुसार येत्या 15 फेब्रुवारीपासून महाविद्यालयं 50 टक्के विद्यार्थी उपस्थितीच्या अटीवर सुरु होणार आहेत.

उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी याबाबत माहिती दिली आहे. विद्यार्थ्यांना कोविड संकट पाहता तूर्तास 75 टक्के सक्तीच्या उपस्थितीची अट बंधनकारक असणार नाही. राज्यातील शाळा सुरू झाल्या मात्र, महाविद्यालये सुरू झाली नव्हती. त्यामुळे महाविद्यालयं त्वरित सुरु करण्याची मागणी अनेकजण करत होते.

त्यातच राज्यातील कोरोनाचे संकट कमी झाले आहे. त्यामुळे महाविद्यालये सुरु करण्याच्या हालचाली सुरु झाल्या होत्या. अखेर 50 टक्के विद्यार्थी उपस्थितीच्या अटीवर महाविदयालये सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: