“चिरीट तोम्मया, आमदार शिवसेनेला मतदान करतीलच पण.” दिपाली सय्यद हिने लगावला टोला

 

राज्यसभेच्या निवडणुकीमुळे राज्यात वातावरण चांगलेच तापले असून आमदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी महाविकास आघाडी आणि प्रमुख विरोधी पक्ष भाजप यांच्यात स्पर्धा आहे. त्यांना विविध प्रकारचे प्रोत्साहन दिले जात आहे. तसेत सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीका देखील करत आहेत. भाजपनेते किरीट सोमय्या नेहमी शिवसेनेवर टीका करत असतात.

दरम्यान सोमय्यांना आता शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनी जोरदार उत्तर दिले आहे. “चिरीट तोम्मया, आमदार शिवसेनेला मतदान करतीलच पण विश्वास तुमच्यावर नाही. दिल्लीचा पैसा आंब्याच्या पेट्या सांगून हॅलिकॉप्टरने उतरवाल यांत शंका नाही. पाच वर्षे शिवसेनेची यात शिवसेना लढेलही आणि जिंकेलही”, असा टोला दिपाली सय्याद यांनी शिवसेनेला लगावला आहे.

शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनी भाजपाचे नेते किरीट सोम्मया, आमदार आशिष शेलार, अमृता फडणवीस, आमदार अतुल भातखळकर, चंद्रकांत पाटील व भाजप पाठींबा करत असलेली अपक्ष खासदार नवनीत राणा व त्यांचे पती यांना टार्गेट करून पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट पत्र लिहिले आहे. दिपाली सय्यद यांनी हे पत्र ट्विटद्वारे शेअर केले आहे.

 

Team Global News Marathi: