लॉकडाऊनवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मोठे भाष्य…..!

लॉकडाऊनवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मोठे भाष्य…..!

खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घेतलेल्या मुलाखतीच पहिला भाग आज प्रसार माध्यमांवर प्रसिद्ध झाला. या मुलाखतीत खासदार तथा सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी लॉकडाऊन कधी संपणार याबाबत मुख्यमंत्र्यांना बोलते केले.

यावर बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणले की, ‘राज्यात केलेला लॉकडाऊन हा कंटाळा घालवण्यासाठी केलेला नव्हता. त्यामुळं कंटाळा आला म्हणून तो उठवताही येणार नाही. घिसाड-घाईने लॉकडाऊन उठवला आणि लोक मृत्युमुखी पडले तर त्याची जबाबदारी कोण घेणार? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

राज्यातील लॉकडाऊन केव्हा संपणार ? हा राज्यातील जनतेचा प्रश्न आहे असा प्रश्न खासदार राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना विचारताच इतर देशात लॉकडाऊन उठवल्यानंतर निर्माण झालेल्या भयावह परिस्थितीची आठवण मुख्यमंत्र्यांनी करून दिली तसेच मी ट्रम्प नाही आहे असे सुद्धा मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखविले.

ग्लोबल न्युज नेटवर्क: