मास्क, व्हेंटीलेटर, पीपीई किट देण्यास केंद्र सरकारचे नकाराचे पत्र – राजेश टोपे
अनलॉक प्रक्रिया सुरु झाल्यापासून राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यातच आता मास्क, व्हेंटिलेटर, पीपीई किट देणार नसल्याचे केंद्र सरकारने जाहीर केले आहे. सध्या राज्यात विशेष करून ग्रामीण भागात कोरोनाचे संकट अधिक बिकट होत असताना केंद्राने तडकाफडकी पाठिंबा काढून घेणे योग्य नाही असे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे.
याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्री तसेच पंतप्रधान मोदींना पत्र लिहिणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी आवर्जून सांगितले. तसेच याबाबत केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याशी बोलणे झाल्याचे सुद्धा अरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
केंद्र सरकारच्या गाईडलाइन प्रमाणे राज्य अनलॉक करतोय, ई पास बंद केले, कार्यालयातील उपस्थित वाढवली आहे त्यामुळे कोरोना संसर्ग वाढतोय असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. नुसत्या पुण्यात मास्क वापरत नाही म्हणून १ कोटीच्यावर नागरिकांकडून दंड वसूल करण्यात आला आहे. त्यातच १५ सप्टेंबर पासून स्वस्थ मोहित महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात राबवण्यार
येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. यात ट्रेसिंग आणि टेस्टिंगवर भर दिला जाणार आहे.
जशी संख्या वाढणार तसा ताण पडतो आणि बेड मिळत नाही. ज्यांना लक्षणे नाहीत अशा पॉझिटिव्ह रुग्णांनी घरीच राहिले पाहिजे. ८० टक्के लोकांना लक्षणे नसतात, त्यामुळे काळजी घ्यायला हवी असेही आरोग्यमंत्र्यांनी बोलून दाखविले.