बॉलिवूड हे महाराष्ट्र आणि मुंबईची देन, अभिनेता गोविंदाचा योगी आदित्यनाथ यांच्यावर पलटवार
ग्लोबल न्यूज: उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ काही दिवसापूर्वी दोन दिवसीय मुंबई दौऱ्यावर आले होते. यावेर्ळी मुंबई प्रमाणे उत्तरप्रदेश येथे चित्रपटसृष्टी निर्माण करणार असल्याची घोषणा योगिनीं केली होती. तसेच मुंबईतील बॉलिवूड इंडस्ट्री उत्तर प्रदेश येथे हवण्याचा त्यांचा विचार आहे अशी चर्चा होत होती. तसेच मुंबई येथे काही दिग्दर्शक आणि चित्रपट सृष्टीतील वेग-वेगळ्या लोकांची भेट सुद्धा घेतली होती. यामुळे योगी आदित्यनाथ विरुद्ध राज्यातील सत्ताधारी पक्ष असा वाद निर्णय झाला होता. आता यावर सिनेअभिनेता गोविद यांनी भाष्य केले आहे.
बॉलिवूड ही महाराष्ट्राची व मुंबईची देन असून याला उभं करण्यात शरद पवार सारख्या नेतृत्वाचा मोठा हातभार आहे. मुंबई अनेक उद्योग आणि विविधतेने नटलेले जागतिक दर्जाचे शहर आहे. महाराष्ट्र सार्वभौम असून महाराष्ट्राने देशाला कला, संस्कृती, इंडस्ट्री अशा अनेक गोष्टी दिल्या आहेत’ असं म्हणत अभिनेता गोविंदाने योगी सरकारला प्रत्युत्तर दिले आहे.
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने परळीमध्ये सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी अभिनेता गोविंदा आपल्या पत्नीसह यावेळी उपस्थितीत होता. त्या दरम्यान गोविंदाने योगी आदित्यनाथ यांना बॉलीवूड कोणीही मुंबईतून नेऊ शकत नाही असे म्हणत योगींना सुनावले आहे.