मुख्यमंत्र्यांना बॉलीवूड आणि त्यांच्या चिरंजीवांना पब, बारची चिंता’ -आशिष शेलार
मुंंबई: भारतीय जनता पक्षाचे आमदार आशिष शेलार यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर सडाडुन टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांना बॉलिवूड तर, त्यांच्या चिरंजीवांना पब, बारची चिंता जास्त आहे,’ असा आरोप शेलार यांनी लगावला होता.
विधपरिषदेच्या पदवीधान आणि शिक्षक मतदार संघातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार आशिष शेलार पुणे येथे आले होते. यावेळी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत शेलार यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली होती.
यावेळी शेलार यांनी मतदारांवर अविश्वास दाखवणाऱ्या महविकास आघाडीचा प्रचाराचा, नेत्याचा आणि उमेदवाराचा त्यांनी निषेध केला. ठाकरे सरकारनं राज्याची जी दयनीय अवस्था केली आहे, त्या विरोधात मतदारांनी मतदान करावं, असं आवाहन त्यांनी केलं. ‘हे सरकार पळपुटे आणि पराधीन आहे. शेतकऱ्यांना मदत दिली जात नाही. शिक्षणाबाबत सावळागोंधळ आहे. कुठलीही मागणी केली की हे लोक केंद्र सरकारकडं बोट दाखवतात.
पुढे बोलताना शेलार म्हणाले की मराठा आरक्षणचा विषय निघाला की सर्वोच्च न्यायालयाकडे बोट दाखवतात. मंदिर उघडा म्हटले की हे मुहूर्त काढणाऱ्यांकडे बोट दाखवतात. पब, बार आणि रेस्टॉरंट उघड्याण्याच्या आधी मंदिरं उघडा, ही मागणी अवास्तव नाही. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मंदिरांपेक्षा बॉलिवूड आणि त्यांच्या चिरंजीवांना पब व बारची चिंता अधिक आहे,’ असे शेलार यांनी बोलून दाखविले .