दिग्दर्शक जावेद अख्तर यांच्या घरासमोर भाजपा कार्यकर्त्यांचे आंदोलन

 

दिग्दर्शक जावेद अख्तर यांना अफगाणिस्तानमध्ये सत्तेवर असलेल्या कुख्यात संघटना तालिबानची राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विश्व हिंदू परिषद यांच्याशी तुलना करून नवा वाद अंगावर ओढवून घेतला होता तसेच टिप्पणी करणे महागात पडले आहे. मुंबईतील त्यांच्या घरासमोर भाजपचे कार्यकर्ते सातत्याने आंदोलन करत आहेत. यामध्ये ते पोलिसांशीही भिडले आहेत.

येथे भाजपचे आमदार राम कदम यांनी म्हटले आहे की, जोपर्यंत ते हात जोडून माफी मागत नाही, तोपर्यंत जावेद अख्तरचा कोणताही चित्रपट भारतात प्रदर्शित होऊ देणार नाही. अख्तर यांचे वक्तव्य केवळ लज्जास्पदच नाही तर संघ आणि विश्व हिंदू परिषदेचे करोडो समर्थक आणि त्या विचारसरणीचे पालन करणारे कोट्यवधी लोकांसाठी वेदनादायक आणि अपमानास्पद आहे. तालिबानला जसे इस्लामिक राज्य हवे आहे तसे काही लोकांना हिंदू राष्ट्र हवे आहे असे त्यांनी अलीकडेच म्हटले होते.

जावेद अख्तर यांनी एका मुलाखतीदरम्यान म्हटले होते की, RSSचे समर्थन करणाऱ्या लोकांची मानसिकता देखील तालिबानसारखीच आहे. आरएसएसला पाठिंबा देणाऱ्यांनी स्वतः चौकशी केली पाहिजे. ते पुढे म्हणाले की, तुम्ही ज्या संघटनेला पाठिंबा देत आहात , त्यात आणि तालिबानमध्ये काही फरक नाही. ते लक्ष्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत आणि त्यांचे मैदानही मजबूत होत आहे.

Team Global News Marathi: