सिनेअभिनेत्री कंगना रानौत हिने मुंबई पोलिसांवर आणि मुंबईची पाकव्याप्त काश्मीर असा उल्लेख केल्यामुळे तिच्या विरोधात सर्व राज्यभर संतापाची लाट पसरली होती. त्यातच आमदार प्रताप सरनाईक यांनी “आमच्या शिवसेनेच्या रणरागिणी कंगनाचे थोबाड फोडतील असे वक्तव्य केले होते तसेच तिच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी सरनाईक यांनी केली होती.
यावर आता राष्ट्रीय महिला आयोग कंगनाच्या मदतीला धून आले आहेत. राष्ट्रीय महिला आयोगाने शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या अटकेची मागणी केली आहे. यावर प्रतिक्रिया देताना ट्विट करत आमदार प्रताप सरनाईक यांनी ‘भाजपने राष्ट्रीय महिला आयोगाला हाताशी धरून मला अटक करायचा खेळ रचला आहे. पण लक्षात ठेवा, मुंबई आणि महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी मला कितीही वेळा तुरुंगात जावे लागले तरी मी तयार आहे असे सरनाईक यांनी ट्वीट केले आहे.
पुढे बोलताना त्यांनी “मी माझ्या विधानावर ठाम आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत १०६ वीरांनी पत्करलेल्या हौतात्म्यामुळे मुंबई महाराष्ट्राला मिळाली. त्या मराठी माणसाच्या रक्त सांडून मिळवलेल्या मुंबई बद्दल कोणीही काहीही बोलेल तर खपवून घेणार नाही असेही सरनाईक यांनी पुढे बोलून दाखविले आहे.