भाडे करार केवळ 11 महिन्यांसाठी का असते? हे आहे त्यामागील कारण

 

आपल्यापैकी असे लोक आहेत. जे भाड्याच्या घरात राहातात किंवा आपलं घर इतरांना भाड्यानं देतात. तुम्हाला माहितच असेल की यावेळी लोक भाडेकरार करतात. जो 11 महिन्यांसाठीचा असतो.मात्र तुम्हाला कधी असा प्रश्न पडलाय का, की वर्ष हे 12 महिन्यांचं असतं. मग फक्त 11 महिन्यांसाठीच हा भाडे करार का केलं जातं? तो 12 महिन्यांसाठी का केला जात नाही? तर असे का होते याचे उत्तर आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

असे फार कमी लोक आहेत, जे भाडे कराराला प्राधान्य देत नाहीत आणि भाडे करार न करता एकाच ठिकाणी दीर्घकाळ थांबतात. तर प्रथम आम्ही तुम्हाला असा सल्ला देतो की ही चूक तुम्ही कधीही करु नका. कारण यामुळे तुमची फसवणूक होऊ शकते. अशा परिस्थितीत, आज आम्ही तुम्हाला भाडे करार म्हणजे काय आणि घरमालक आणि भाडेकरू या दोघांसाठी हे का महत्त्वाचे आहे हे सांगत आहोत. याशिवाय भाडे करार 12 महिन्यांऐवजी 11 महिन्यांसाठी का केलं जातं, यामागील कारण देखील सांगणार आहोत.

तुम्ही पाहिलं असेल की जेव्हा कधी भाडेकरू, घरमालक किंवा दलाल यांच्याकडूनही भाडे करार करतात, तेव्हा तो करार केवळ 11 महिन्यांसाठी केला जातो. मग हा करार फक्त 11 महिन्यांसाठी का करतात? तर भारतीय नोंदणी कायदा आहे. कलम 17 मध्ये काही कागदपत्रे देण्यात आली आहेत, त्यांची नोंदणी आवश्यक आहे आणि भाडेपट्टा कराराचाही त्यात उल्लेख आहे.

आम्ही तुम्हाला सांगतो की भाडे करार हा एक प्रकारे लीज डीड मानला जातो. त्यात असे म्हटले आहे की, जर एक वर्षापेक्षा जास्तचा तुम्ही करार केला असेल तर तुम्हालाही लीज डीड करावी लागेल. अशा परिस्थितीत भाडे करार 1 वर्षापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला सेल डीडची नोंदणी करावी लागेल. अशा परिस्थितीत, हा खर्च टाळण्यासाठी, भाडे करार केवळ 11 महिन्यांसाठी केला जातो.

Team Global News Marathi: