शिवसेनेमुळे माझे केस उडाले, चंद्रकांत पाटील यांची सडकून टीका !

 

मुंबई | राज्यात शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षासोबत युती करून महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले होते. मात्र सरकार स्थापन केल्यानंतर आघाडी सरकार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्याची एकही संधी विरोधक सोडताना दिसून येत नाहीत. त्यात आता पुन्हा एकदा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सेनेवर टीका केली आहे.

भाजपा पाच वर्षे शिवसेनेसोबत सरकारमध्ये होती. सरकारमध्ये सोबत असतानाही शिवसेना रोज भांडायची. शिवसेना खासदार संजय राऊत रोज जाकिट सावरत यायचे. आपण सरकारमध्ये आहोत हेही त्यांना कळायचे नाही. रोज आम्हाला शिव्याशाप दिले जायचे. रोज बाहेर पडण्याची, राजीनाम्याची भाषा केली जायची. माझ्याकडे तेव्हा आठ खाती होती. त्यांच्यासोबत सरकार चालवल्यामुळे माझ्या डोक्यावरचे केस उडाले, अशा शब्दांत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर टीका केली.

भाजपच्या ओबीसी मोर्चाला मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी त्यांनी शिवसेनेसोबत सरकार चालवण्याचा अनुभव किती भयंकर होता हे आपल्या खास शैलीत सांगितले. ओबीसीच्या मुद्द्यावरूनही त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. एकतर अनेक विषयांमधले ह्यांना काही कळत नाही. खोडा घालायचा एवढेच कळते. त्यामुळे आपल्याला आपल्या ताकदीवर एकहाती सरकार आणायचेच आहे. त्यासाठी देवेंद्र फडणवीस सांगतील, त्या दिशेने आपण सगळे धावूया, असे पाटील म्हणाले.

Team Global News Marathi: