मुंबई-ठाण्यासह या भागात पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
सावधान! पुढील १२ तासांत उत्तर कोकण, मुंबई, ठाणे आणि पालघरला धुळीच्या वाऱ्यांसह अवकाळी पावसाचा धोका
मुंबई : राज्यात अवकाळी पावसाचं संकट आणि वाढणारी थंडी बदललेल्या वातावरणामुळे अनेक नागरिकांना त्रास होत आहे. तर अवकाळी पावसामुळे बळीराजावर संकट ओढवलं आहे. काल संध्याकाळी मुंबईसह अनेक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पडल्या. त्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ पाहायला मिळाली.
राज्यातील काही ठिकाणी आजही हलक्या पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे. आंबा आणि काजू बागायतदारांसाठी ढगाळ हवामान आणि अवकाळी पावसामुळे संकट ओढवलं आहे.
दुसरीकडे हवामान विभागाने पुन्हा एकदा अवकाळी पवासाचा अंदाज व्यक्त केला आहे. राज्यात येत्या 2 दिवसात कोकणात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. असा हवामान विभागानं अंदाज वर्तवला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा तसाच विदर्भात हवामान कोरड राहील अशी शक्यता व्यक्त केली आहे.
23/01; पुढील १२ तासांत उत्तर कोकणात काही ठिकाणी धुळीचे वारे (तास 20-30 किमी) येण्याची शक्यता आहे. मुंबई ठाणे पालघर आणी आसपासच्या भागांत
– IMD
Pl read below,
To distinguish dust layer. Dust appears pink/magenta during day and purple at night. pic.twitter.com/sT4Kb81ARL— K S Hosalikar (@Hosalikar_KS) January 23, 2022
पुढील १२ तासांत उत्तर कोकणात काही ठिकाणी धुळीचे वारे (तास 20-30 किमी) येण्याची शक्यता आहे. मुंबई ठाणे पालघर आणी आसपासच्या भागांत असाही अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
धुळीच्या वाऱ्यामुळे काही ठिकाणी दृश्यमानता कमी होण्याचीही शक्यता आहे. हवेतील धुलीकणांचं प्रमाण वाढल्यानं मुंबईत लोकल ट्रेन, आणि उंच इमारती काहीशा अंधुक दिसत असल्याचेही फोटो समोर आले आहेत. तसंच मुंबईत आज सकाळपासूनच हवेची गुणवत्ता खालावल्याची माहिती मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभागाचे वरीष्ठ शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीतर यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.
हवेत धुलीकणांचं प्रमाण वाढल्याचा परिणाम मुंबईत काही ठिकाणी दिसून आला आहे. मुंबईतील उंचच उंच इमारती धुळीच्या वाऱ्यामुळे दिसेनाशा झाल्याचं चित्र पाहायला मिळालं आहे.