बाळासाहेबांचा मुलगा म्हणून किती दिवस ब्लॅकमेल करणार? शिंदे गटाच्या या नेत्याचा टोला

 

एकनाथ शिंदे यांनी ४० आमदार फोडून थेट महाविकास आघाडी अल्पमतात आणले होते पुढे थेट भाजपा बरोबर युती करून मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती त्यानंतर शिवसेनेकडून बंडखोरी करणाऱ्या आमदारांवर आणि खासदारांवर थेट गद्दारीचा ठपका ठेऊन सत्ता टीका करण्यात येत होती अशातच शिंदे गटात सामील झालेले माजी मंत्री रामदास कदम यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

‘बाळासाहेबांचा मुलगा .. बाळासाहेबांचा मुलगा म्हणून लोकांना किती वर्ष ब्लॅकमेल करणार आहात. शरद पवारांच्या मांडीवर बसलात तेव्हा बाळासाहेबांच्या विचारांची आठवण झाली का ? असा सवाल करत शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी थेट मातोश्रीवरच हल्लाबोल केला आहे. शिंदे गटात सामील झाल्यानंतर रामदास कदम यांनी पहिल्यांदाच थेट मातोश्रीवरच हल्लाबोल केला आहे. यावेळी खासदार विनायक राऊत यांच्यावर जहरी टीका केली आहे .

उद्धव ठाकरे अजून किती दिवस बाळासाहेबांचा मुलगा म्हणून लोकांना ब्लॅकमेल करणार आहात. आता महाराष्ट्र दौरा करत आहात. त्यानंतर मी पण महाराष्ट्र दौरा करणार लोकांना नेमकी वस्तुस्थिती महाराष्ट्राला सांगणार आहे. उद्धवजींना जे मिळाले ते बाळासाहेबांचा मुलगा म्हणून आणि आदित्यला मिळाले ते उद्धव ठाकरेंचा मुलगा म्हणून पण पक्ष संघटना आम्ही वाढवली.

आता सगळ्यांना भेटीगाठी सुरू आहेत मागच्या अडीच वर्षात काय आलं होतं. उद्धव ठाकरे यांनी भावनात्मक डायलॉग बाजी थांबवावी’, असंच रामदास कदम म्हणाले. ‘महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अडीच वर्षात केवळ तीन वेळा मंत्रालयात आले, कोकणात वादळ आले, अस्मानी संकट आले तेव्हा कोकणवासीयांची अश्रू पुसायला त्यांना वेळ नव्हता, शरद पवारांसारख्या नेता कोकणात आला मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अश्रू पुसण्यासाठी कोकणात आले नाहीत. आता बाप बेटे बाहेर पडले असा टोला सुद्धा रामदास कदम यांनी लगावला होता.

Team Global News Marathi: