आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे कोरोना रुग्णसंख्या, बूस्टर डोसबाबत मोठे विधान

 

राज्यासह देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशातच राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मोठे विधान केले आहे. राज्यातील पाच जिल्ह्यांवर विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचं ते म्हणाले आहेत. तसेच याच पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाची काल बैठक झाली, त्याबाबत त्यांनी माहिती दिली आहे.

आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, आमचे लक्ष लसीकरणावर आहे. विशेषत: बूस्टर डोसकडे दुर्लक्ष केले जाऊ नये. खबरदारीचा डोस असल्याने राज्य ते मोफत देणार नाही. दरम्यान, सध्या राज्यात कोणतेही निर्बंध नाहीत. परंतु लोकांना मास्क घालण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच मंत्रिमंडळात याबाबत काल सविस्तर सादरीकरण करण्यात आले. मुंबई आणि ठाणेसह राज्यातील 9 जिल्हे आहेत. ज्यात प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे या पाच जिल्ह्यांवर विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचं टोपे म्हणाले

राज्यात रुग्णांची संख्या वाढतेय आणि त्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाची काल बैठक झाली. या बैठकीत सर्वाधिक रुग्णवाढ असलेल्या पाच जिल्ह्यांबाबत खबरदारी घेण्यावर चर्चा झाली. मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, रायगड या जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढतेय आणि त्यामुळे या पाच जिल्ह्यांवर विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचं बैठकीत चर्चा झाली. गेल्या 7 दिवसांत राज्यातली कोविड रुग्णसंख्या लक्षणीयरित्या वाढली आहे. गेल्या आठवडाभरात राज्यातील रुग्णांमध्ये 130.84. % ची वाढ झाली आहे. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, पुणे हे पात जिल्हे नवे हॉटस्पॉट. ठरत आहेत. 4.31 % लक्षणे असलेले रुग्णांना रुग्णालयांत भरती करण्यात आले आहे. 95 % रुग्णांना लक्षणे नाहीत तर 1.04% रुग्ण गंभीर आहेत.

Team Global News Marathi: