आरोग्यमंत्री राजेश टोपेंचा करोनाबाबत मोठा दिलासा म्हणाले

 

मागच्या अडीच वर्षांपासून जगभरात थैमान घालणाऱ्या करोनाच्या वाढत्या लसीकरणामुळे मोठ्या प्रमाणावर नियंत्रण मिळवण्यात जगभरातल्या अनेक देशांना यश आल्याचं दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर इतर देश आणि राज्यांप्रमाणेच महाराष्ट्रात देखील काही दिवसांपूर्वी करोनाचे सर्व निर्बंध हटवण्यात आले.

मात्र, या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा करोनाबाधितांची संख्या धिम्या गतीने का होईना, वाढू लागले आहेत. त्यामुळे पुन्हा करोनाचं तेच भीषण रूप दिसणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यावर आज राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलासादायक विधान केलं आहे. ते पुण्यात माध्यमांशी बोलत होते.

दोनच दिवसांपूर्वी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांशी बोलताना करोनाच्या चौथ्या लाटेची भीती व्यक्त केली होती. “जून, जुलैमध्ये करोनाची चौथी लाट जास्त जीवघेणी ठरत असल्याचं वाटलं तर लसीकरणच तारणहार असणार आहे. लसीकरणाचं प्रमाण वाढवणं महाराष्ट्रासमोर महत्वाचं काम असणार आहे. आरोग्य विभाग याबाबतीत अत्यंत सजग आणि जागरुक राहून लसीकरणाचं काम करत आहे,” असं राजेश टोपे म्हणाले होते.

Team Global News Marathi: