अर्जुन खोतकरांना मी वाघ समजतोय, तो सुभाष देसाईंसारखा शेळी कधी झाला?

संजय राऊतांच्या मैत्री बंगल्यावर ईडीचं पथक पोहोचलं आहे. अश्यात ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी पत्रकार परिषद घेत विविध मुद्द्यांवर आपली मतं मांडली. कदम यांना अर्जुन खोतकरांना सवाल विचारला आहे. “अर्जुन खोतकरांना मी वाघ समजतोय, तो सुभाष देसाईंसारखा शेळी कधी झाला?”, असं रामदास कदम यांनी म्हटलंय.

तसेचइच्छा नसताना शिंदेगटात जावं लागतंय, असं म्हणत अर्जुन खोतकर यांनी आपली झालेली कोंडी बोलून दाखवली. त्याबाबत विचारलं आसता सर्वात आधी खोतकरांनी मला फोन केला होता, पण मला असं काही बोलेल नाहीत. हा एवढा घाबरट कधीपासून झाला हा, म्हणजे त्याने खाल्लेत का पैसे? अर्जुन खोतकरांना मी वाघ समजतोय, तो सुभाष देसाईंसारखा शेळी कधी झाला?, म्हणालेत.

पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे मुख्यमंत्री असतानाही सर्वात कमी निधी हा सेनेच्या आमदारांनाच होता. जर शिवसेनेबद्दल एवढे प्रेम होते तर आमदारांवर अन्याय होताना त्यांनी आपली रोखठोक भूमिका का मांडली नाही. ते शिवसेनेचे नेते असले तरी त्यांनी कायम राष्ट्रवादीचे हित जोपासण्याचा प्रयत्न केल्याचा घणाघात रामदास कदम यांनी केला आहे.

अविनाश भोसले यांच्या घरावर छापेमारी, सीबीआयकडून एक हेलिकॉप्टर जप्त

‘मी सावध केलेले पण ऐकतील ते संजय राऊत कुठले’

Team Global News Marathi: