Friday, September 22, 2023
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result
ADVERTISEMENT

इर्शाळवाडी दरड दुर्घटना अजितदादा ॲक्शन मोडमध्ये

by Team Global
July 20, 2023
in महाराष्ट्र, मुंबई
0

रायगड : खालापूर तालुक्यात असलेल्या इर्शाळवाडी गावावर काल रात्री दरड कोसळून भीषण दुर्घटना घडली. आतापर्यंत दहा जणांचा मृत्यू झाला २१ जण जखमी आहेत. ढिगाऱ्याखाली ६० ते ७० रहिवासी अडकल्याची भीती व्यक्त केली जात असून त्यांचा शोध सुरु आहे. या घटनेची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री अजित पवार तातडीने अॅक्शन मोडमध्ये आले. अजितदादांनी लागलीच परिस्थिती नियंत्रणासाठी आपत्कालीन कक्षात धाव घेतली. त्यानंतर विधिमंडळात अजित पवार यांनी निवेदनही दिलं.

अजित पवार यांनी दिलेली माहिती
इर्शाळवाडी ही उंच दुर्गम अशा डोंगरवर इर्शाळगडाच्या पायथायशी वसलेली आहे. या ठिकाणी वाहने जाण्यासही रस्ता उपलब्ध नाही. मौजे चौक मानिवली या गावातून पायी चालत जावे लागते. वाडीत ४८ कुटुंब वास्तव्यास असून लोकसंख्या २२८ इतकी आहे. गेल्या तीन दिवसात (दि. १७ जुलै ते १९ जुलै) इथे ४९९ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

काल रात्री १०.३० ते ११ वाजताच्या दरम्यान ही दुर्घटना घडलेली आहे. ११.३० च्या सुमारास जिल्हा प्रशासनास माहिती मिळाली. रात्री १२ वाजता राज्य नियंत्रण कक्षास माहिती मिळाली.

इर्शाळ वाडी ही चौक मानिवली ग्राम पंचायतमधील डोंगर दरीत वसलेली छोटीशी वाडी आहे. ही वाडी उंच दुर्गम अशा डोंगरावर इर्शाळ गडाच्या डोंगर कपारीत वसलेली आहे. या ठिकाणी वाहने जाण्यासाठी रस्ता उपलब्ध नसून, मौजे चौक मानवली या गावातून पायी चालत जावे लागते. ही वस्ती तीव्र उतारावर असल्याने दैनंदिन दळवळण प्रमुख रस्त्याने जोडलेले नाही.

मुंबईपासून ८० किमी अंतरावर आहे. दूरध्वनी/मोबाईलने संपर्क साधणेही कठीण आहे. प्रामुख्याने ठाकर नावाचा आदिवासी समाज या वाडीत राहतो. इर्शाळवाडी हे ठिकाण भारतीय भूवैज्ञानीक सर्वेक्षण विभागाच्या अहवालानुसार संभाव्य दरड प्रवण ठिकाणाच्या यादीत समाविष्ट करण्यात आलेले नाही. यापूर्वी या ठिकाणी दरड कोसळणे, भूस्खलन होणे अशा प्रकरच्या घटना घडलेल्या नाहीत.

प्रामुख्याने ठाकर समाजाची ४८ कुटुंब असून २२८ इतकी लोकसंख्या असलेली वाडी आहे. त्यापैकी २५ ते २८ कुटुंब बाधित झालेली आहेत. २२८ पैकी ७० नागरिक स्वत: घटनेच्या वेळीच सुरक्षित असल्याची प्राथमिक माहिती आहे. तर २१ जण जखमी असून त्यापैकी १७ जणांवर तात्पुरत्या बेस कॅम्पमधे उपचार केले असून सहा जणांना पनवेल येथील MGM हॉस्पिटलमध्ये उपचार दिले जात आहेत.

शासनाने मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत जाहीर केली असून जखमींच्या उपचाराचा खर्च शासनाकडून करण्यात येणार आहे.

मी स्वत: रायगड, पालघर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गडचिरोली, पुणे, सातारा, कोल्हापूर, अहमदनगर या जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरुन संपर्क साधला असून आवश्यक त्या खबरदारीच्या उपाययोजना करण्याबाबत सूचना दिल्या आहेत.

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
ADVERTISEMENT
Next Post

TATA GROUP भारतात मेक इन इंडिया चा ट्रेड पण टाटा ग्रुप ब्रिटन मध्ये उभारणारा 425 अब्ज रुपयांची फॅक्टरी

Recent Posts

  • राज्यावर पुढचे ३-४ तास अस्मानी संकट; मुंबई, ठाण्यासह या भागांना मुसळधार पावसाचा इशारा
  • 13 लाख एलआयसी एजंट आणि एक लाख कर्मचाऱ्यांना सरकारची भेट ,अर्थ मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
  • आमच्या पप्पांनी गणपती आणला’, वडापावची गाडी चालविणारे गीतकार, चिमुकले गायक प्रसिद्धीपासून दूर…
  • राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार ,आय एम डी कडून 24 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट….
  • कळंब येथे 28 ऐवजी 29 सप्टेंबरला ईद-ए-मिलाद

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group