मुंडे प्रकरणात अजित पवार संतापले, कोणाचं लग्न झालं होतं आणि कोणाला किती मुलं सांगू का?
राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर केलेली बलात्काराची तक्रार मागे घेतल्यानंतर राष्ट्र्वादीने आरोप करणाऱ्या विरोधकांवर आता घणाघाती टीका केली आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावरुन विरोधकांना टोला लगावला असून कोणाला किती मुलं आणि कोणाचं लग्न झालं होतं सांगू का? अशी विचारणा केली आहे.
अजितदादा म्हणाले की, आता विरोधकांना काय म्हणावं…एकदा समर्थन केल्याने आता तोंडघशी पडले आहेत. पहिल्यांदा काही तरी थातूरमातूर उत्तर द्यायचं आणि त्यामध्ये लोकांची दिशाभूल करायची हा त्यांचा केविलवाणा प्रयत्न असतो,” अशी टीका अजित पवार यांनी केली आहे.
प्रतिज्ञापत्रात मुलांचा उल्लेख नसल्याच्या टीकेवर बोलताना ते म्हणाले की, “धनंजय मुंडे यांना जे काही सांगायचे होते ते त्यांनी सांगितलं आहे. मग जर रेकॉर्ड पहायचं झालं तर अनेकांनी काय काय थोडी लपवाछपवी केली आहे ती सांगू का? ते आपल्यालाही माहिती आहे ना. कोणाला किती मुलं होती आणि कोणाचं लग्न झालं होतं आणि कोणाचं लग्न झालं नव्हतं. अशा बर्याच गोष्टी असतात. कशाला त्या खोलात जायला सांगता असा टोला विरोधकांना लगावला होता.