अहमदनगरचे पालकमंत्री हरवले आहेत त्यांना तातडीने शोधा, मनसेचे आवाहन
ग्लोबल न्यूज: सध्या नगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. दररोज शहरात मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत आहे. त्यात मृतांचा आकडा देखील मोठया प्रमाणात वाढलेला दिसून येत आहे. दररोज जिल्हयात ८०० ते ९०० रुग्ण आढळून येत असल्यामुळे नगर जिल्हयाच्या चिंतेत अधिक भर पडली आहे.
मात्र आज उद्भवलेल्या परिस्थितीकडे नगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी कानाडोळा करत नगर जिल्ह्याकडे पाठच फिरवली आहे. त्यांना पालकपद स्वीकारलेल्या नगर जिल्ह्याकडे द्यायला पुरेसा वेळ मिळत नाही असा आरोप महाराष्ट्र नवनिर्म सेनेचे शहराध्यक्ष परेश पुरोहित यांनी लावला आहे.
या संदर्भात मनसेने थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून जिल्हयाचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हरवले आहेत, त्यांना तातडीने शोधून द्या अशा आशयाचे पत्र मुख्यमंत्र्यांना पाठविले आहे. हसन मुश्रीफ यांनी आपल्या स्वतःच्या कागल मतदारसंघामध्ये लॉकडाउन केला आहे. परंतु नगरमध्ये दररोज मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित रुग्ण आढळत असूनही त्यांना नगरकडे लक्ष्य देण्यासाठी वेळ नाही.
अमरधाममध्ये मृत्यू झालेल्यांना जाळण्यासाठी जागा उपलब्ध नाही. मात्र पालकमंत्री हसन मुश्रीफ हे बैठकांव्यतिरिक्त जिल्हयात फिरकत नसल्याने ते हरवले आहेत का? अशी शंका पुरोहित यांनी पत्रात व्यक्त केली आहे