अहमदशाह, आदिलशहा, निजामशहा, कुतुबशहा आता अमित शाह; अंबादास दानवेंची खरमरीत टीका

 

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सोमवारी मुंबई दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी शिवसेना आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. त्यांच्या याच टीकेला अनेक शिवसेना नेत्यांनी उत्तर दिले आहे. दरम्यान विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी अमित शहांच्या मुंबई दौऱ्यावरून जहरी टीका केली आहे. अहमदशाह, आदिलशहा, निजामशहा, कुतुबशहा आता अमित शाह अशा शब्दात त्यांनी अमित शहांवर टीका केली आहे.

अंबादास दानवे यांनी याबाबत फेसबुकवर पोस्ट करतांना म्हटले आहे की, अहमदशाह, आदिलशहा, निजामशहा, कुतुबशहा आता अमित शाह..दिल्लीवरून किती शहा आले माझ्या राज्याचे राज्य जिकण्यासाठी, पण गद्दारांची साथ घेऊन पण मराठी मावळा चवताळून उठला तसाच आजही तेच करायची वेळ आली. जनता शिवसेनेसोबतच! जय महाराष्ट्र!

मुंबई महानगरपालिका जिंकण्यासाठी भाजपने गेल्यावर्षी सुद्धा बैठका घेतल्या होत्या. तसेच आत्ताप्रमाणेच मुंबई महानगरपालिका आपल्या ताब्यात घेण्याचा निश्चय गेल्यावर्षी भाजपने केला होता, पण त्यात त्यांना यश मिळाले नाही. त्यामुळे यावेळी सुद्धा ते अयशस्वीच ठरणार असल्याचं अंबादास दानवे म्हणाले. तर अमित शहा यांचेसारखे देशपातळीवरील भाजपचे नेते मुंबईत येतात हे शिवसेनेचं नैतिक यश असल्याचं दानवे म्हणाले.

Team Global News Marathi: