नवी दिल्ली – केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी शनिवारी (२६ सप्टेंबर) नवीन भारतीय कृषी संशोधन संस्थाचे (आयएआरआय आसाम) उद्घाटन केले. या संशोधन संस्थेचे नाव पंडीत दीनदयाळ उपाध्याय असे असल्याचे तोमर म्हणाले. या संस्थेच्या स्थापनेमुळे अरुणाचल प्रदेश, मेघालय, मणिपूर, त्रिपुरा आणि सिक्कीम या राज्यांमध्ये कृषी शिक्षण आणि संशोधनाच्या विकासाला चालना मिळणार असल्याचे तोमर म्हणाले.
२०५० पर्यंत देशाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात असणार आहे. लोकसंख्या आणि हवामान बदलाचे मोठे आव्हान देशापुढे असल्याचे तोमर म्हणाले. शेतकऱ्यांचे उत्पन्न आणि निर्यातीच्या संधी वाढवण्यासाठी स्थानिक पातळीवर घेतल्या जाणाऱ्या पिकांचे महत्त्व वाढवणे गरजेचे असल्याचे तोमर म्हणाले. देश कृषी क्षेत्रातील आव्हानांना सामोरे जाण्यास तयार आहे. त्या दिशेन सरकार काम करत असल्याचे तोमर म्हणाले.
मराठवाडा अन विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात उद्या जोरदार पावसाचा अंदाज
यावेळी बोलताना तोमर यांनी कृषी शास्त्रज्ञांचे देखील कौतुक केले. शास्त्रज्ञांनी बरीच उच्च उत्पादन देणारी बियाणे विकसीत करुन हरितक्रांती घडवून आणली आहे. त्यांनी घेतलेल्या भुमिकेचे तोमर यांनी कौतुक केले.
भारत हा अन्नधान्याच्या बाबतीत केवळ स्वावलंबीच नाहीतर अतिरीक्त अन्नधान्य उत्पादनात देखील आघाडीवर असल्याचे तोमर म्हणाले. सरकार विकास प्रकियेतील तफावत दूर करण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यासाठीच झारखंड आणि आसाममध्ये नवीन कृषी संस्था स्थापन करण्यात आली असल्याचे वक्तव्य कृषीमंत्र्यांनी केले.
राष्ट्रपतींनी तिन्ही कृषी विधेयकांवर केल्या स्वाक्षरी; झाले कायद्यात रुपांतर
हवामान बदल आणि पाणीटंचाईचे खूप मोठे आव्हान शेतकऱ्यांपुढे आहे. त्यासाठी पिकांच्या कमी पाण्यात दर्जेदार उत्पन्न देणाऱ्या बियाणांच्या जाती निर्माण करणे गरजेचे असल्याचे तोमर म्हणाले.
दरम्यान, सरकार कृषीक्षेत्रात येणाऱ्या आव्हानांना सामोरे जाण्यास तयार आहे. बरीच उत्पन्न देणारी बियाणे विकसीत करण्याचा प्रयत्न कृषी शास्त्रज्ञ करत आहेत. त्यामुळे भारत आता स्वावलंबी झाला आहे.