दिल्लीत कृषीमंत्री म्हणून दहा वर्षे बसून IPL सामने मात्र भरवता येतात – अतुल भातखळकर
शेतकरी कृषी कायद्यावरून मागच्या अनेक दिवसांपासून शेतकरी राजधानी दिल्ली येथे केंद्राने पारित केलेल्या काळ्या कायद्याविरोधात आंदोलन करत आहे. त्यात शेतकऱ्याच्या जीवावर उठलेले काळे कायदे लवकरात लवकर रद्द करावे या मागणीसाठी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळत आहे.
शेतकऱ्यांच्या आंदोलनाला महिना झाला असून शरद पवार हे चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळत आहे. त्यांनी केंद्र सरकारला ३० डिसेंबर म्हणजेच उद्यापर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. तर, ‘राज्यांशी कोणतीही चर्चा किंवा त्यांचे मत जाणून न घेताच केंद्र सरकारने कृषी कायदे रेटून नेले. दिल्लीत बसून शेती करता येत नाही’, अशी टीका शरद पवार यांनी केंद्रातील मोदी सरकारवर केली आहे.
आत पवारांच्या या टीकेला भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी जोरदार टोला लगावला आहे.‘…पण दिल्लीत कृषिमंत्री म्हणून दहा वर्षे बसून IPL सामने मात्र भरवता येतात’ असा टोला भातखळकरांनी लगावला आहे. आता या टीकेला राष्ट्रवादी काय उत्तर देते हे पाहावे लागणार आहे.