कोल्हापूर : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी ट्विटरवरून काही वेळापूर्वी खळबळजनक विधान केले होते. त्यांनी सरकार माझ्यावर पाळत ठेवत असल्याचे म्हटल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. त्यांच्या या ट्विटरवरून सर्वांच्या भुवया उंचावल्या. मात्र आता त्यांनी याप्रकरणावरून आणखी एक ट्वीट करत खुलासा केला आहे.
आपल्यावर सरकार पाळत ठेऊन आहे. यातून काय साध्य होणार असा सवाल त्यांनी विचारला होता. दरम्यान या ट्विटनंतर संभाजीराजेंना गृहमंत्र्यांनि कॉल करून झाल्या प्रकाराबद्दल माहिती दिली. त्यात हेरगिरीचा उद्देश नसल्याचे सांगितले. गृहमंत्र्यांनी जे सांगितलं त्यावर मी समाधानी असून पाळत ठेवल्याचा विषय संपला असल्याचेही संभाजीराजे म्हणाले.
मी सुद्धा त्यांच्या या वक्तव्यावर समाधानी असून.
हा विषय संपला आहे.@CMOMaharashtra @OfficeofUT @maharashtra_hmo @Dwalsepatil
(२/२)
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) May 31, 2021
काय म्हंटल ट्विटमध्ये?
आताच गृह मंत्र्यांचा फोन आला होता. त्यांनी सांगितले आहे की, यावेळी त्यांनी खालच्या कर्मचाऱ्यांची बैठकीचे ठिकाणी आत जिल्हाधिकारी चेंबरमध्ये येण्याची चूक झाली. परंतु त्यांचा उद्देश हेरगिरीचा नव्हता. माझ्या सुरक्षेच्या दृष्टीने त्यांनी तसे केले असावे. यामुळे हेरगिरी माझ्या सुरक्षेसाठी असल्याचे त्यांनी ट्वीट करुन सांगितले आहे. त्यांच्या या वक्तव्यावर मी समाधानी असल्याने हा विषय संपला आहे, असे संभाजीराजे यांनी सांगितले आहे.
सरकार माझ्यावर पाळत ठेवत आहे.
माझी हेरगिरी करण्याचा नेमका उद्देश माहीत नाही.
पण मला हेच लक्षात येत नाहीये की माझ्यासारख्या सरळ आणि प्रामाणिकपणे काम करणाऱ्या एका कार्यकर्त्यावर हेरगिरी करून काय साध्य होणार आहे?
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) May 31, 2021