प्रतिनिधी
कळंब तालुक्यातील आढाळा गावातील ; नागरिकांना रस्त्याची दुरवस्था झाल्याने जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.
आढाळा ते चौफळा हे साधारण चार किलोमीटर अंतरावर आहे. या दरम्याच्या रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली असल्याने व रस्त्याची दुरुस्तीही झालेली नसल्या कारणाने या रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडले असून या रस्त्याचे मूळ रूपच गायब झाले असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
गावातील ग्रामस्थांना शेजारील गावात शेतात ,तालुक्याला जाण्यासाठी या रस्त्याचा वापर केला जातो. मात्र हा रस्ता अतिशय खराब झाल्यामुळे आता लांबचा वाटत आहे.
या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून या खड्ड्यात पावसाचे पाणी साचले आहे. पावसाची संततधार रिमझिम मुळे या रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य देखील निर्माण झाले असल्यामुळे वाहन चालविणे जिकरीचे होत आहे. चारचाकी वाहने तर या रस्त्यावरून चिखलामुळे जातानाही दिसत नाहीत. दोन चाकी वाहनांचे अनेक छोटे मोठे अपघात या रस्त्यावरून झाले आहेत . रस्त्यावर चिखल झाल्याने यावरून दु चाकी घसरत असल्याने त्यात अनेकांना जखमी व्हावे लागले आहे. मोठं मोठे खड्डे, यामुळे वाहन चालक त्रासले आहेत. व्यावसायिक, दुकानदार, नोकरदार, विद्यार्थी, प्रवासी या रस्त्याचा वापर करतात. या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे अनेक प्रवासी आडसुळवाडी मार्गे पुढील गावांना जाणे पसंद करत आहे. या रस्त्याची अवस्था असून अडचण नसून खोळंबा या म्हणी प्रमाणे झाली आहे. ग्रामस्थांनी,वारंवार लोकप्रतिनीधी व स्थानिक प्रशासनाकडे रस्त्याची मागणी करुन देखील रस्ता होत नसल्याने ग्रामस्थांकडुन नाराजी व्यक्त केली जात आहे.
माझे शेत आढाळा चौफळा रस्त्या वाहन चालक
लगत असुन गेली दहा ते पंधरा वर्ष झाले हा रस्ता चांगला होत नसल्याने आम्हाला पावसाळ्यात शेतातील माल बाजारात आणने देखील कठीन झाले आहे -(आण्णासाहेब शिंदे)
रस्ता खराब रस्त्यामुळे वाहन या गावांना यायला कचरतात. दुचाकी चालकांना खड्डे चुकवत प्रवास करावा लागतो. बऱ्याचदा अपघातही घडतात. गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही रस्ता दुरुस्तीची मागणी करीत आहेत. मात्र संबंधित विभागाच्या व लोकप्रतिनी च्या दुर्लक्षामुळे अजुन हि काम होत नाही-सचिन हगारे ( ग्रा.प सदस्य)
रस्त्यावर मोठे मोठे खड्डे व चिखल झाल्यामुळे गाडी घसरते त्यामुळे आम्ही त्या रस्त्याने जाणेच टाळतो-बाळू खारतुडे (वाहन चालक)