आता फक्त स्वस्त आहे मरण, त्याला कधी जीएसटी लावता? राजू शेट्टी यांची केंद्रावर घणाघाती टीका

 

वस्तू आणि सेवा कर मधील बदल 18 जुलै 2022 पासून देशभरात लागू झाले आहेत. त्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे. नवीन दर लागू झाल्याने अनेक जीवनावश्यक वस्तू महाग झाल्या आहेत. त्यामुळे महागाईमध्ये होरपळत असलेल्या जनतेचा आणखी एक दणका बसला आहे. देशभरात कडाडून विरोध होत असतानाही मोदी सरकारकडून नेहमीप्रमाणे आपला निर्णय रेटताना अधिसूचनाही काढली आहे.

या निर्णयावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी मोदी सरकावर हल्ला चढवला आहे. त्यांनी सोशल मीडियात पोस्ट करत म्हटले आहे की, पेट्रोल, डिझेल गॅस महाग, शिक्षण आवाक्याबाहेर, दवाखाना परडवत नाही, तेल, मीठ, चटणी, तांदूळ, डाळ, दही साखर, वह्या पुस्तके साऱ्यांनाच जीएसटी.. आता स्वस्त आहे फक्त मरण त्याला केव्हा लावता जीएसटी? असा बोचरा त्यांनी केला आहे.

दरम्यान, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या GST परिषदेने आपल्या शेवटच्या बैठकीत कॅन केलेला किंवा पॅकेज केलेले आणि लेबल केलेले (फ्रोझन वगळता) मासे, दही, पनीर, लस्सी, मध, कोरडे मखना, कोरडे सोयाबीन, वाटाणे, गहू आणि इतर उत्पादनांना मान्यता दिली. तृणधान्ये आणि मुरमुऱ्यावर पाच टक्के जीएसटी लावण्याचा निर्णय घेतला. तथापि, उघड्यावर विकल्या जाणार्‍या अनब्रँडेड उत्पादनांवर जीएसटी सूट कायम राहील.

राहुल शेवाळे यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेचं मुख्यमंत्र्यांना पत्र

’12 नाही, आपले तर 18 खासदार’, दिल्लीत पोहोचताच एकनाथ शिंदे यांचे सूचक विधान

Team Global News Marathi: