🎬 कसा आहे ‘सलमान चा भारत’?
🎯 बॉलिवूडचा दबंग खान सलमानचा बहुचर्चित सिनेमा ‘भारत’ आज ईदच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच सलमानची 5 वेगवेगळी रुप प्रेक्षकांना पाहता येणार आहे. अली अब्बास जफर यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे.
🧐 सिनेमाची कथा : सिनेमाच्या सुरुवातीला भारताचं विभाजन त्या काळातील जनतेची परिस्थिती दाखवली आहे. सिनेमात भारतचे वडील जॅकी श्रॉफ व बहीण तब्बू हे लाहोर मध्ये वास्तव्यास असतात. भारत- पाक विभाजन नंतर भारत (सलमान खान) भारतात येतो. त्यानंतर भारत एका सर्कसीमध्ये स्टंटमॅन म्हणून काम करत असतो. सर्कसी दरम्यान, त्याचं त्याच्या मैत्रिण (दिशा पटाणी) सोबत प्रेम होत.
त्यानंतर उत्तरार्धामध्ये 1970 चा काळ रंगविण्यात आला आहे. या उत्तरार्धामध्ये तेल निर्यात कंपनीमध्ये काम करणाऱ्या कुमुद रैनाचा (कतरिना कैफ) प्रवेश होतो. सर्कसमधील मैत्रिणीवर प्रेम करणारा भारत कुमुदच्या प्रेमात पडतो आणि येथून चित्रपटाला सुरुवात होते. या दोघांचं प्रेम, भारताचं होणारं विभाजन, त्यातच त्याला पाच वेगवेगळी रुप का साकारावी लागतात हे प्रेक्षकांना चित्रपट पाहिल्यानंतरच लक्षात येईल.
🎭 अभिनय : सिनेमात सलमानने 20 वर्षापासून ते 70 वर्षे वय असलेल्या व्यक्तीची भूमिका उत्तमरीत्या साकारली आहे. कॅटरिना, तब्बू, दिशा पटानी, सुनील ग्रोव्हर, सोनाली कुलकर्णी, सुनील ग्रोव्हर, जॅकी श्रॉफ यांनीदेखील आपल्या भूमिकांना योग्य न्याय दिला आहे.
🎼 सिनेमाचे संगीत कसे आहे? : सिनेमाची गाणी प्रदर्शनापूर्वीच हिट झाली आहे. ‘स्लो मोशन’ गाणे तर लोकप्रिय झाले आहे. प्रत्येक सीनला साजेशा गाण्यांचा सिनेमात समावेश करण्यात आला असून संगीत ठीक-ठाक आहे.
💁♂ सिनेमा पाहावा कि नाही? : या चित्रपटामध्ये रोमान्स, सस्पेन्स, इमोशनल सीन या साऱ्यांचा भरणा करण्यात आला आहे. भाईजानचा अभिनय व जोडीला कॅटरिनाची साथ असल्यामुळे प्रेक्षकांना सिनेमा नक्कीच आवडेल. सलमानच्या चाहत्यांना वेगळं सांगायची गरज नाही.