मुंबई | राज्यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. उद्धव ठाकरे बहुमत सिद्ध करण्याच्या अग्नीपरिक्षेतही पास झाले आहेत. आता लवकरच ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराची सर्वांना प्रतिक्षा आहे. मात्र त्यासाठी तीन आठवड्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्याकडून हे संकेत देण्यात आले आहे.
प्रफुल्ल पटेल म्हणाले की, ‘उपमुख्यमंत्री पद राष्ट्रवादी काँग्रेसलाच दिले जाणार आहे. मात्र उपमुख्यमंत्री कोण होणार याबाबतचा निर्णय अद्याप झालेला नाही. 22 डिसेंबरनंतर हा निर्णय घेण्यात येईल’ यासोबतच नागपूर येथे होणारे हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर म्हणजेच 22 डिसेंबरनंतर उपमुख्यमंत्री पदाबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचेही ते म्हणाले.