पुणे | छञपती संभाजी महाराज यांच्यावर आधारित ‘स्वराज्यरक्षक संभाजी’मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. जवळपास गेल्या दोन वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांच्या हृदयाचा ठाव घेत आहे. या मालिकेचा शेवट जवळ आला आहे. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होणार आहे. या अनुसंगाने ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेतील सर्व कलाकार टिम ने छञपती संभाजी महाराज याची बलिदान भुमी असलेल्या वढू, तुळापुरला भेट दिली.
यावेळी सर्व कलाकार छञपती संभाजी महाराज यांच्या समाधी समोर नतमस्तक होताना दिसून आहे. तर ही मालिका शेवटच्या टप्प्यात येऊन पोहचली असताना वढू येथे आयोजित केलेल्या पञकार परिषदेत संभाजी महाराजांची भुमिका साकारणारे अभिनेते खासदार डॉ. अमोल कोल्हे हे भावूक झाल्याचे दिसून आले. यावेळी त्यांनी सर्व महाराष्ट्रातील शंभू भक्ताचे आभार मानले. सर्वसह कालाकार टिमचे देखील आभार मानले.