तान्हाजी द अनसंग वॉरिअर’ चित्रपटानंतर सैफ अली खान वादग्रस्त व्यक्तव्यामुळे चर्चेत आला होता. त्यानं या चित्रपटात उदयभानची भूमिका साकारली होती. या चित्रपटात दाखवला तो इतिहास नाही, असं सैफ म्हणाला होता.
यावरून अजय देवगन आणि काजोल त्याच्यावर नाराज असल्याच्या चर्चा होत्या. मात्र काजोलनं आमच्यात सारं काही आलबेल असल्याचं सांगितलं आहे. सैफ ओघात बोलत जातो, आता त्यातलं काय ऐकावं आणि कोणती गोष्ट दुसऱ्या कानानं ऐकून सोडून द्यायची हे तुम्हाला ठरावायचं. मी त्याच्यावर नाराज नाही, असं काजोल म्हणाली.
‘तान्हाजी द अनसंग वॉरिअर’ या चित्रपटात अजयनं तान्हाजींची तर काजोलनं त्यांच्या पत्नीची भूमिका साकारली होती. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर सैफनं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. उदयभान ही भूमिका मला खूप आवडली होती. मात्र या चित्रपटात दाखवला तोच इतिहास आहे असं लोक म्हणतात तेव्हा मला वाटत नाही की तो इतिहास आहे. इतिहास नेमका काय आहे त्याची माहिती मला आहे.
त्याचप्रमाणे तान्हाजी चित्रपटात जी स्वराज्याची संकल्पना दाखवली आहे ती इतिहासात नव्हतीच, ही कल्पना ब्रिटीशांनी भारतीयांना दिली असंही सैफ म्हणला. हिंदी चित्रपटसृष्टीत तान्हाजीसारखे चित्रपट तयार केले जातात कारण असे चित्रपट चालतात.
मात्र तथ्यात बदल करणं घातक ठरू शकत’ असंही सैफ म्हणाला होता. यावरुन त्याच्यावर मोठी टीका झाली होती. खुद्द काजोल आणि अजयदेखील नाराज असल्याचं म्हटलं जात होतं, मात्र काजलनं एका कार्यक्रमात या संदर्भात खुलासा केला आहे.