मुंबई | राज्यात महायुतीला बहुमत मिळाले असूनही ते सत्ता स्थापन करण्यास सक्षम नाही. शिवसेना आणि भाजपा यांच्यातील वाद विकोपाला गेले आहे. त्यामुळे भाजपाने सर्वात मोठा पक्ष असतानाही आपण सरकार स्थापन करणार नाही. भाजपने रविवारी संध्याकाळी याविषयी माहिती दिली. यानंतर राज्यपालांनी दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून शिवसेनेला सत्ता स्थापनेचे आमंत्रण दिले आहे. यानंतर आता शिवेसना भाजप युती मोडणार असल्याचे चित्र आहे. शिवसेनेला सत्ता स्थापन करण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची पाठिंबा घेणे गरजेचे आहे. दरम्यान आज सामनाच्या अग्रलेखातून राहुल गांधींवर सुस्ती सुमनं उधळण्यात आली आहेत.
गेल्या अनेक वर्षांपासून अयोध्या प्रकरण सुरू होते. आता न्यायालयीन लढाईनंतर अयोध्येतील राम मंदिर आणि बाबरी मस्जिदचा वाद संपुष्टात आला आहे. मात्र, या राज्यातील राजकीय वातावरण तापलेले असतानाच, हा निकाल आला. त्यामुळे सर्वच पक्षांकडून सावध भूमिका घेत, या निकालाचे स्वागत करण्यात आले आहे. आता, या निकालानंतर शिवसेनेनं राहुल गांधींवर स्तुती सुमनं उधळली आहे. जसे शिवसेनेकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेखही करण्यात आलेला नाही.
‘आपल्या मित्रपक्षाला आणि विशेषत: त्यातील काही निवडक नेत्यांना प्रचंड अहंकाराने पछाडले असून, शिवसेनेचा केवळ वापर करून घेण्याचे त्यांचे धोरण आहे, अशा शब्दांत भाजपवर टीका शिवसेनेने टीका केली. यानंतर शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस असे सरकार स्थापन करता येऊ शकते असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी शिवसेना आमदारांच्या बैठकीत म्हणाले. तर, खासदार संजय राऊत यांनीही काँग्रेस राज्यातील जनतेच्या विरोधी नाही, असे म्हटले होते. त्यानंतर, सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेकडून आज राहुल गांधींच्या भूमिकेचं स्वागत करत त्यांचं कौतुक करण्यात आलं आहे. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा भाजपाचा उल्लेखही करण्यात आला नाही.
बाबराच्या खुणा आधी शिवसैनिकांनी मिटवल्या, आता राष्ट्रीय मुसलमानांनी मिटवाव्यात. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी अत्यंत नम्रपणे या निर्णयाचे स्वागत केले. अयोध्येचा निर्णय देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे, त्याचे स्वागत करू असे राहुल गांधी म्हणाले. हा सामंजसपणा आहे, हा सामंजसपणा औवेसीसारख्या नेत्यांनी दाखवायला हरकत नव्हती, असे म्हणत सामनातून राहुल गांधींचे कौतुक करण्यात आले आहे. मात्र, या निर्णयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेल्या प्रतिक्रियेचा उल्लेखही सामनातून करण्यात आलेला नाही. उद्धव ठाकरेंनी जाहीर सभांमधून मोदी सरकारकडे राम मंदिराची मागणी अनेकदा केली आहे. मात्र, निकालानंतर मोदींचा उल्लेख जाणीवपूर्वक टाळल्याचे दिसून आले. दरम्यान, राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची महाआघाडी स्थापन होऊन, सरकार बनेल, अशीच परिस्थिती सध्या दिसत आहे. त्यात, एनडीए सरकारमधील मंत्री आणि शिवसेना नेते अरविंद सावंत यांनीही आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले आहे.