राजेंद्र यादव
सांगोला : देशाच्या स्वातंत्र्यापासून व महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीपासून काही अपवाद वगळता आत्तापर्यंतच्या बहुतांशी कालावधीमध्ये सांगोला विधानसभेचे सदस्य हे प्रादेशिक राजकीय पक्षाचे राहिलेले असून दुर्दैवाने राज्याच्या सत्ताधारी राजकीय पक्षाच्या विरोधात राहिलेले आहेत त्यामुळे सां
गोला विधानसभा कार्यक्षेत्राचा अपेक्षित असा विकास झालेला नाही.
केवळ याच कारणा करीता भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून सातत्याने दुष्काळी व आर्थिक मागासलेपणाचा कलंक कायमस्वरूपी पुसून काढण्याकरता मी भाजपकडे सांगोला विधानसभा मतदारसंघातून उमेदवारीची मागणी केली असल्याची माहिती माजी उपनगराध्यक्ष चेतनसिंह केदार यांनी काल सांगोला येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
यावेळी भाजप किसान मोर्चाचे शिवाजीराव गायकवाड, ॲड. गजानन भाकरे,शीतल लादे,नवनाथ भोसले,वसंत सुपेकर,संजय गंभीरे यांचेसह भाजपचे अनेक सदस्य उपस्थित होते
प्राधान्य क्रमाने औद्योगिक विकासाचे माध्यमातून तरुणांच्या हाताला काम ,टेंभू ,म्हैसाळ व नीरा उजवा कालवा या सिंचन प्रकल्पातून शेतीसाठी खात्रीचे पाणी ,मतदारसंघात मधील अंतर्गत रस्त्यांची कामे व वीज या कामांना न्याय देण्याकरता येणाऱ्या 2019 च्या विधानसभा निवडणुकीत मी भारतीय जनता पक्षाकडे विधानसभेची उमेदवारी मिळावी अशी मागणी केली आहे
सामाजिक कार्यात सहभाग, खेळासाठी अनुदान ,धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभाग ,यामुळे पूर्ण मतदारसंघांमध्ये माझ्या उमेदवारीची थोरामोठ्या सह सर्वत्र चर्चा व मागणी होत आहे त्यामुळे मी खात्रीने या मतदारसंघांमध्ये भाजपचा प्रतिनिधी म्हणून निवडून येण्याची खात्री असल्यानेच विधानसभेसाठी भाजपकडे उमेदवाराची मागणी केली आहे.
मी स्वतः तसेच भाजपचे अन्य इच्छुक अनेक उमेदवार असले तरी राजकीय परिस्थितीनुसार भाजपचे पक्ष जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असून पक्षाचा जो उमेदवार असेल त्याला भरघोस मतांनी निवडून आणण्याचे आम्हा सर्वांनी ठरवले आहे भाजपने निवडणुकीत उमेदवारी दिली तर मोठ्या ताकतीने निवडणूक लढवून तालुक्याच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपचे खाते उघडणार असल्याचा ठाम विश्वास असल्याचे यावेळी चेतनसिंह केदार यांनी सांगितले
सध्या केंद्र व राज्यात भाजपचे सरकार सत्तेवर असून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीतही महाराष्ट्रात भाजपचीच सत्ता येणार आहे सांगोला तालुक्यात सुमारे 11900 भाजपचे सदस्य असून सुमारे एक हजार पदवीधर मतदारांची नोंदणी केली आहे.
गेल्या अनेक वर्षापासून शेतकऱ्यांचे प्रश्न ,पाणीप्रश्न सोडविण्यासाठी अनेक आंदोलनात सहभाग नोंदविला आहे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवून शेतीमालाला हमीभाव देण्यासाठी तसेच तालुक्याचा अनेक वर्षापासूनचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी भाजपकडे मी सांगोला विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मागितली आहे पक्षाने संधी दिल्यास मोठ्या ताकतीने येणारी निवडणूक लढवून विजयी होऊ असा ठाम विश्वास चेतन सिंह केदार यांनी यावेळी व्यक्त केला.
=======================
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा ग्लोबल न्यूज मराठी चे फेसबुक पेज व खालील शेअर बटनावर ↘↘↘ क्लिक करुन आत्ताच ही बातमी तुमच्या फेसबुकवर शेअर करा.
@ग्लोबल मीडिया सोल्युशन्स.