मुंबई । ठाकरे सरकारची अग्निपरीक्षा असलेल्या अधिवेशनाला आज सुरुवात झाली. आजच विधानसभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जावे लागणार आहे. दुपारी दोन वाजता अधिवेशनाला सुरुवात होताच दोन्हीकडून घोषणाबाजीने सुरुवात झाली. अधिवेशनाला प्रारंभ होताच भाजप नेते देवेंद्र फडणवीस बोलण्यास उभा राहिले. त्यांनी सुरुवातीपासून सरकारवर हल्ला चढवण्यास सुरुवात केली. हे अधिवेशन नियमाला अनुसरून होत नसल्याचा आरोप त्यांनी केला. फडणवीस यांनी २७ नोव्हेंबरलाच अधिवेशन संस्थगित झाल्याचे सांगितले. अधिवेशन बोलण्यासाठी राज्यपालांनी समन्स बजावणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
नियमित अध्यक्षांच्या निवडीपूर्वी विश्वासमत ठराव का? 170 आकडा तुमच्याकडे आहे तर मग भीती कसली? गुप्त मतदान झालं तर विश्वासमत मिळणार नाही, ही भीती होती, नियमबाह्य पद्धतीने हे सभागृह चालू आहे असही मत देवेंद्र फडणवीस यांनी मांडले. तसेच देशाच्या इतिहासात हंगामी अध्यक्ष बदलण्याची घटना कधीही घडलेली नाही, कोणत्या भीतीने हंगामी अध्यक्ष बदलले? असा सवाल यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी केला.
दरम्यान, यावर बोलताना सभागृहाबाहेर घडलेल्या घटनेबाहेर मी काही बोलणार नाही, हंगामी अध्यक्ष निवडीचा अधिकार मंत्रिमंडळाला आहे, मंत्रिमंडळाने ही निवड राज्यपालांकडे पाठवली, ती मंजूर करुन राज्यपालांनी माजी निवड केली, त्यामुळे निवड कायदेशीर नाही अस मत दिलीप वळसे पाटील यांनी मांडले.