खबर जगाची सकाळच्या सुपरफास्ट हेडलाईन वृत्तसंकलन: गुरुराज माशाळ
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारला ७५ दिवस पूर्ण झाले आहेत. त्यानिमित्त मोदींनी एक विशेष मुलाखत दिली असून त्यात सरकारच्या ७५ दिवसांच्या कामांचा आढावा घेतला आहे. जम्मू-काश्मीर मधून कलम ३७० हटविण्याचा निर्णय राजकीय हेतूने घेण्यात आलेला नाही, हा निर्णय राष्ट्रहिताच्या दृष्टिकोणातून घेण्यात आल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली.
इस्लामाबाद : पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खानने आणखीन एक चितावणीखोर निर्णय घेतला आहे. इमरान खान आज 14 आगस्ट रोजी पाकव्याप्त काश्मीरचा दौरा करणार असून येथील विधानसभेला संभोधीत करणार आहे.
इस्लामाबाद : भारताने जम्मू काश्मीरबाबत घेतलेल्या निर्णय विरोधात 14 आगस्ट “काश्मीर एकजूट दिन” तर 15 आगस्ट काळादिवस दिवस म्हणून पाळण्याची आवाहन पाकिस्तानने केली आहे. त्यासाठी “काश्मीर बनेगा पाकिस्तान” असे वादग्रस्त लोगो बनविण्यात आले आहे.
कोलकाता : काँग्रेस नेते शशी थरुर यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलं आहे. कोलकाता न्यायालायने हे अटक वॉरंट जारी केलं आहे. गतवर्षी शशी थरुर यांनी हिंदू पाकिस्तान निर्माण करण्यासंबंधी वक्तव्य केलं होतं. याच वक्तव्यामुळे त्यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलं आहे.
राजस्थान : माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी मंगळवारी राज्यस्थानातून राज्यसभा सदस्यत्वासाठी अर्ज दाखल केला. या वेळी त्यांच्यासोबत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, उपमुख्यमंत्री सचिन पायलट उपस्थित होते. भाजप प्रदेशाध्यक्ष मदनलाल सैनी यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर 26 ऑगस्टला पोटनिवडणूक होणार आहे.
उत्तर प्रदेश: ३७० कलमावरून केंद्र सरकारवर टिका केली आहे. सरकारने असंवैधानिक मार्गाने ३७० कलम हटविले असून त्यांचा हा निर्णय संविधान विरोधी आहे, सरकारने नियम आणि कायद्यांचे पालन केलेले नाही असा आरोप प्रियांका गांधी- वाड्रा यांनी केला.
मुंबई : नागपूर – मुंबई समृद्धी महामार्गावर बांधकाम क्षेत्राशी संबंधित दहा कौशल्य केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. या माध्यमातून तरुणांसाठी मोठ्याप्रमाणात रोजगार उपलब्ध होणार असल्याचे माहीती राज्याचे कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिली
शिर्डी : कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात पूरग्रस्तांना शिर्डीच्या साईबाबा संस्थानकडून दहा ऐवजी आता बारा कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. संस्थानने मंजूर केलेल्या दहा कोटींच्या निधीला मंजुरी देताना उच्च न्यायालयाने स्वच्छता साहित्य खरेदीसाठी आणखी दोन कोटी रुपये त्या दोन्ही जिल्ह्यांना थेट द्यावेत, असा आदेश दिली आहे.
कोयना : कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरल्याने सहा वक्री दरवाजे एका फुटाने कमी करण्यात आले आहेत. मंगळवारी दुपारी धरणाचे दरवाजे तीन फुटांवर स्थिर ठेऊन धरणातून प्रतिसेकंद 27 हजार 265 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
सांगली : सांगली जिल्ह्यात खंडित झालेल्या वीजपुरवठा युद्धपातळीवर सुरु केला जात आहे. हे करताना एका वायरमनला शॉक लागून मृत्यू झाली आहे. बंद पडलेल्या ट्रान्सफार्मरची दुरुस्ती करत असताना विजेचा धक्का बसल्याने वायरमनचा मृत्यू झाला. संजय बाळासाहेब जाकले वय 40, रा. खोची, ता. हातकणंगले असं त्यांचं नाव आहे.
सोलापूर : उजनीवरील १९ धरणांच्या पाणलोट क्षेत्रातील पाऊस बंद झाल्याने दौंड येथून येणाऱ्या विसर्गात मोठ्या प्रमाणात घट झाल्याने उजनीतून भीमा नदीत सोडण्यात येणारा विसर्ग कमी करण्यात आली आहे. तो केवळ ५००० क्युसेक्स इतका विसर्ग केला जात आहे. दौंड येथील ७३५६४ क्युसेक्स येणारा विसर्ग कमी होवून २११७२ क्युसेक्स पर्यंत कमी करण्यात आला आहे. त्यामुळे भीमा नदीतील विसर्ग कमी झाला आहे.
सोलापूर : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महापौर आणि उपमहापौरांना 3 महिन्याची मुदतवाढ देण्यात आली आहे. यामुळे महापौर शोभा बनशेट्टी आणि उपमहापौर शशिकला बत्तूल यांना दिलासा मिळाला आहे.
सोलापूर : सोलापूर शहर मध्यचे विद्यमान आमदार प्रणिती शिंदे यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना भावनिक साद घातली आहे. माझ्या बोलण्याने कोणी दुःखी झाले असते तर मला छोटी बहीण समजून माफ करावे असे प्रणिती शिंदे म्हणाल्या त्या हॉटेल हेरिटेज येथे काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांसाठी आयोजित रक्षाबंधन कार्यक्रमात बोलत होत्या.
सोलापूर : पूरस्थिती ओसरल्यानंतर सातारा व सोलापूर जिल्ह्यातील सर्व भागातील वीजपुरवठा सुरु करण्यात आला आहे. यामध्ये ७६२८० कृषिपंपांसह पुणे जिल्ह्यातील १ लाख ४ हजार, कोल्हापूर १ लाख २५ हजार, सांगली ४८,२५०, सातारा २२,९२० तर सोलापूर १३६६० अशा एकूण सुमारे ३ लाख १५ हजार घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व इतर अशा अकृषक वीजग्राहकांचा समावेश आहे.
अक्कलकोट : येथील श्री वटवृक्ष स्वामी समर्थ देवस्थानकडून कोल्हापूर- सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी 1 लाख रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेण्यात आली आहे. मंदिर समितीच्या विशेष सभेत हा निर्णय घेण्यात आला. पूरस्थितीतुन सावरण्यासाठी देवस्थानच्या वतीने स्वामी प्रसाद म्हणून ही मदत जाहीर केल्याचे मंदिर समितीचे अध्यक्ष महेश इंगळे यांनी सांगितले.