संजयमामा आणि आढळराव पाटलांच्या विजयी उमेदवारांना शुभेच्छा..!!!

लोकसभा निवडणुकीत राज्यातील बऱ्याच मतदारसंघात चुरशीच्या लढती झाल्या. यामध्ये प्रामुख्याने माढा आणि मावळ मतदारसंघाचा समावेश आहे. दोन्ही ठिकाणी अनुक्रमे भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ अमोल कोल्हे विजयी झाले. त्यानंतर पराभूत उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचे संजयमामा शिंदे आणि शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव पाटील या दोन्ही उमेदवारांनी आपल्या फेसबुक अकाऊंट वरून विजयी खासदारांना शुभेच्छा देऊन सकारात्मक राजकारणाचे पाऊल उचलले आहे.

admin: